प्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी


Current Affairs MCQs[प्र.१] सध्या चर्चेत असलेल्या ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१] राजीव डोग्रा
२] विश्वनाथप्रताप सिंह
३] ए. एस. दुलत
४] संजीव त्रिपाठी


१] राजीव डोग्रा
राजीव डोग्रा १९९२ ते १९९४ या काळात कराचीमध्ये भारताचे वाणिज्यदूत होते. या पुस्तकात भारत पाकिस्तान दरम्यानच्या अनेक वादग्रस्त मुद्यांविषयी भाष्य केल्यामुळे हे पुस्तक चर्चेत आले आहे.
अधिक माहितीसाठी चालू घडामोडी - २६ व २७ जून वाचा.

[प्र.२] २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या शहराला देण्यात आले आहे?
१] मॉस्को (रशिया)
२] न्यूयॉर्क (युएसए)
३] लंडन (युके)
४] बीजिंग (चीन)


४] बीजिंग (चीन)

[प्र.३] जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर २२ क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचा कितव्या स्थानी आहे?
१] ८व्या
२] ११व्या
३] १४व्या
४] १७व्या


३] १४व्या
या अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या २६ लाख आहे.

[प्र.४] ‘कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे’ नावाने कोणत्या नवीन द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे?
१] मुंबई-नाशिक
२] पुणे-नाशिक
३] मुंबई-नागपूर
४] पुणे-नागपूर


३] मुंबई-नागपूर

[प्र.५] सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवलीकरणासाठी सरकारने आगामी चार वर्षांत किती कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले?
१] ७० हजार कोटी रुपये
२] ८० हजार कोटी रुपये
३] ९० हजार कोटी रुपये
४] ९९ हजार कोटी रुपये


१] ७० हजार कोटी रुपये

[प्र.६] सिंगापूर स्वातंत्र्य दिनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूर येथे झालेल्या राष्ट्रीय दिवस संचलनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते?
१] राजनाथ सिंग
२] अनंत गीते
३] नरेंद्र मोदी
४] प्रणव मुखर्जी


२] अनंत गीते

[प्र.७] ३ ऑगस्ट २०१५ रोजी 'एनएससीएन' व भारत सरकार यांच्यात एक महत्वपूर्ण शांतता करार झाला. 'एनएससीएन' ही कोणत्या राज्यातील बंडखोर संघटना आहे?
१] नागालँड
२] सिक्कीम
३] मेघालय
४] मिझोरम


१] नागालँड

[प्र.८] युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बुरस शिखर कोणत्या भारतीय महिलेने सर केले?
१] अरुणिमा सिन्हा
२] कविता राउत
३] बचेंद्री पाल
४] मनीषा वाघमारे


४] मनीषा वाघमारे

[प्र.९] ‘आरबीआय’च्या ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर झालेल्या मौद्रिक धोरणाला अनुसरून खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
१] रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) : ४ टक्के
२] वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) : २१.५० टक्के
३] रिव्हर्स रेपो दर : ७.२५ टक्के
४] बँक रेट : ८.२५ टक्के


३] रिव्हर्स रेपो दर : ७.२५ टक्के
रिव्हर्स रेपो दर : ६.२५ टक्के
रेपो दर : ६.२५ टक्के

[प्र.१०] केंद्र सरकारतर्फे कोणता दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला गेला?
१] २७ जुलै 
२] १ ऑगस्ट
३] ७ ऑगस्ट
४] १ सप्टेंबर


३] ७ ऑगस्ट
या दिवशी १९०५मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला गेला.

२ टिप्पण्या: