विधानसभा निवडणूक २०१६

  • संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकीचे १९ मे २०१६ रोजी निकाल जाहीर झाले. ते खालीलप्रमाणे :
आसाम
  • आसाम विधानसभेत गेल्या १५ वर्षापासून कॉँग्रेसची सत्ता गेली असून, तिथे भाजपच्या नेतृत्त्वाखाली सर्बानंद सोनोवाल यांचे सरकार येणार हे नक्की झाले आहे.
  • भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल. कारण यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचा प्रवेश झाला आहे.
आसाम
बहुमतासाठी आवश्यक जागा : ६४
पक्ष जागा
भारतीय जनता पार्टी ६०
इंडियन नॅशनल कांग्रेस २६
आसाम गण परिषद १४
ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३
बोडोलैंड पीपल्स फ्रंट १२
अपक्ष
एकूण १२६

पश्चिम बंगाल
  • पश्चिम बंगालमध्ये पाच वर्षापूर्वी डाव्यांची ४२ वर्षाची राजवट उलथवून सत्तेवर आलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच वर्षे केलेल्या कारभारावर जनतेने पसंतीची मोहोर उठवली.
  • ममता बॅनर्जी यांना जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. २०११ च्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेसला १८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा २९४ जागांपैकी २११ जागा तृणमूलने जिंकल्या.
  • त्यामुळे आता ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
पश्चिम बंगाल
बहुमतासाठी आवश्यक जागा : १४८
पक्ष जागा
आल इंडिया तृणमूल कांग्रेस २११
इंडियन नॅशनल कांग्रेस ४४
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) २६
भारतीय जनता पार्टी
इतर १०
एकूण २९४

केरळ
  • केरळमध्ये परंपरेनुसार सत्ता बदल झाला असून, डाव्या पक्षांच्या एलडीएफचे सरकार येथे आले आहे. १४० जागांच्या विधानसभेेत एलडीएफला ८५, तर त्यांना पाठिंबा देणारे ८ अपक्ष निवडून आले आहेत.
  • त्यामुळे देशात या एकमेव राज्यात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता येणार आहे.
  • आसामसह केरळमध्येही काँग्रेसने सत्ता गमवली आहे. तर दक्षिणेतील या राज्यात भाजपला अवघी एकच जागा मिळाली.
केरळ
बहुमतासाठी आवश्यक जागा : ७१
पक्ष जागा
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) ५८
इंडियन नॅशनल कांग्रेस २२
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १९
इंडियन यूनियन मुस्लिम लीग १८
भारतीय जनता पार्टी
इतर २२
एकूण १४०

तामिळनाडू
  • तामिळनाडूत गेल्या अनेक दशकांपासून अण्णाद्रमुक व द्रमुकमध्ये अटीतटीची लढत होते. तेथील मतदार आलटून पालटून दोन्ही पक्षांना सत्तेवर बसवतात.
  • १९८४ मध्ये एमजीआर अर्थात एम. जी. रामचंद्रन यांनी सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भुषविले होते. त्यानंतर ३२ वर्षे येथे आलटूनपालटून अण्णाद्रमुक आणि करूणानिधी यांच्या द्रमुकचे सरकारे आली.
  • ही परंपरा यावेळी पहिल्यांदाच मोडली असून, तामिळनाडूच्या जनतेने अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जे. जयललिता यांना सलग दुसऱ्यांदा निवडून दिले आहे.
  • २३४ जागांपैकी १२६ जागा अण्णाद्रमुकने जिंकल्या असून द्रमुक-कॉँग्रेस युतीला १०३ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी कॉँग्रेस केवळ १० जागांवर विजयी झाली.
  • तर डीएमडीके हा विजयकांत यांचा पक्ष अपयशी ठरला असून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. खुद्द विजयकांत यांचा पराभव झाला.
तामिळनाडू
बहुमतासाठी आवश्यक जागा : ११८
पक्ष जागा
ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुन्नेत्र कड़गम १३४
द्रविड मुनेत्र कड़गम ८९
इंडियन नॅशनल कांग्रेस
इंडियन यूनियन मुस्लिम लीग
एकूण २३२

पुद्दुचेरी
  • पुद्दुचेरीत काँग्रेस-द्रमुकचे सरकार पुद्दुचेरी या छोट्या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस-द्रमुक आघाडीने विजय मिळविला आहे. विधानसभेच्या ३० जागांपैकी काँग्रेसला १५ तर, द्रमुकला २ जागा मिळाल्या आहेत.
  • एआयएनआरसी पक्षाचे एन. रंगास्वामी यांची सत्ता गेली आहे. त्यांच्या पक्षाला ८ जागा मिळाल्या. अण्णाद्रमुकला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे भाजपचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
पुद्दुचेरी
बहुमतासाठी आवश्यक जागा : १६
पक्ष जागा
इंडियन नॅशनल कांग्रेस १५
ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस
ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुन्नेत्र कड़गम
द्रविड मुनेत्र कड़गम
अपक्ष
एकूण ३०

या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातील काही लक्षवेधी घटना
  • देशभरात हळूहळू पण ठामपणे भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत आहे. सध्या देशात भाजपा ९ राज्यांमध्ये सत्तेवर असून ४ राज्यांमध्ये भाजपा भागीदारीमध्ये सत्तेत आहे. 
  • पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांत काँग्रेसची कामगिरी खालावली आहे. देशातील २९ पैकी फक्त ६ राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत असून केरळ, आसाममधील सत्ताही काँग्रेसने गमावली आहे. 
  • महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळच्या राजकारणात चंचू प्रवेश करत २ जागा जिंकल्या आहेत.
  • क्रिकेटच्या मैदानात फिक्सिंगच्या आरोपामुळे दरवाजे बंद झाल्यानंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या श्रीशांतचा काँग्रेस नेते व्ही. एस. शिवकुमार यांनी पराभव केला. 
  • गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला ओ. राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  
  • पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या रुपा गांगुली यांचा क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाकडून पराभव झाला. द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा