चालू घडामोडी : ३० व ३१ जुलै

चेक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताला ५ सुवर्ण

  • चेक प्रजासत्ताक येथील ४८व्या ग्रँड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशा एकूण ८ पदकांची कमाई केली.
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिवा थापा (६० किलो), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६९ किलो), अमित फांगल (५२ किलो), गौरव बिधुरी (५६ किलो) आणि सतीश कुमार (+९१ किलो) यांनी सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. 
  • कविंदर बिश्त (५२ किलो) आणि मनीष पनवार (८१ किलो) यांनी रौप्यपदके, तर सुमित सांगवानने (९१ किलो) उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून कांस्यपदक मिळवले.

रशिया अमेरिकेमध्ये पुन्हा तणाव

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रशिया सोडून पुन्हा अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले.
  • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेप आणि युक्रेनमधून ‘क्रिमीया’ला बाहेर काढण्याचा डाव यामुळे अमेरिकेने काही दिवसांपूर्वी रशियावर निर्बंध घातले होते.
  • अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प एकाकी पडले आणि सिनेटने रशियावर निर्बंध टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. अमेरिकेच्या या निर्णयाचा रशियाने निषेध नोंदवला होता.
  • रशियात अमेरिकेचे १००० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यातील ७५५ जणांनी मायदेशी जावे असे आदेश पुतिन यांनी दिले आहेत.
  • यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून आता संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घ्यावा असे पुतिन यांनी म्हटले आहे.

चालू घडामोडी : २९ जुलै

शाहिद अब्बासी पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान

  • नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर शाहिद खाकान अब्बासी हे पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
  • नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे खासदार म्हणून निवडून येईपर्यंत अब्बासी हे पंतप्रधानपदी कायम असतील.
  • सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • संसदेत शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने पंतप्रधानपदाला तूर्तास तरी धोका नाही.
  • शरीफ यांचे बंधू आणि सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असलेले शाहबाज शरीफ हे शरीफ यांचे उत्तराधिकारी असतील.
  • मात्र पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळे शाहबाज यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) खासदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
  • यासाठी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन शाहबाज शरीफ निवडणूक लढवतील.
  • हा मतदारसंघ शरीफ कुटुंबीयांचा बालेकिल्ला असून शाहबाज शरीफ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
 शाहिद खाकान अब्बासी 
  • शाहिद खाकान अब्बासी १९८८पासून सहावेळा ते पाकिस्तानच्या संसदेवर निवडून गेले आहेत.
  • अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटीमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पदवी घेतली आहे.
  • अब्बासी हे नवाझ शरीफ यांचे निष्ठावंत असून, विद्यमान शरीफ यांच्या मंत्रिमंडळात ते तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री होते.
  • यापूर्वी ते एअर ब्ल्यु या खासगी विमान कंपनीचे ते सीईओ तसेच, १९९७ ते १९९९ या काळात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे चेअरमन होते.
  • १९९९साली जनरल परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार उलथवून लावले. त्यावेळी अब्बासी यांना अटक करण्यात आली. ते दोन वर्ष तुरुंगात होते. २००१ साली कोर्टाने त्यांची सुटका केली.
  • शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहिद खाकान अब्बासी ४५ दिवसांसाठी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
 पार्श्वभूमी 
  • नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंगद्वारे लंडन व अन्यत्र मालमत्ता विकत घेतल्याचे पनामा पेपर्स प्रकरणातून समोर आले होते.
  • याप्रकरणी पाकिस्तानच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांनाही दोषी ठरविले.
  • शरीफ यांनी घटनेची पायमल्ली केली असून ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश कोर्टाने दिला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने शरीफ यांनी नाइलाजाने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

जेष्ठ उर्दू लेखक नैयर मसूद यांचे निधन

  • सरस्वती पुरस्काराने सन्मानित जेष्ठ उर्दू लेखक नैयर मसूद यांचे २४ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
  • मसूद यांचे गंजिफा, इत्र ए कांफूर, ताऊस चमन की मैना इत्यादी लघुकथा संग्रह प्रसिध्द आहेत. ३५ कादंबऱ्या व अनेक लघुकथा त्यांच्या नावावर आहेत.
  • नैयर मसूद यांचा जन्म सन १९३६मध्ये लखनौ येथे झाला. नैयर मसूद यांचे वडील सईद मसूद हसन रिझवी हे लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषा शिकवायचे.
  • नैयर यांनीदेखील लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषेचे अध्यापन दीर्घकाळ केले. या भाषेच्या विभागाचे ते प्रमुखही होते.
  • जागतिक साहित्यात खूपच मोठे स्थान असलेल्या फ्रान्झ काफ्काच्या कथा उर्दू भाषेत अनुवादित करण्याचे मोलाचे काम मसूद यांनी केले. काफ्काच्या कथा उर्दूत आणणारे नैयर हे एकमेव लेखक.
  • त्यांच्या लिखाणात सामाजिक व राजकीय विषय सर्रास दिसतात. मात्र त्यांचे लिखाण त्या अर्थाने सुलभ, सोपे नाही. वास्तव, स्वप्न, गूढता यांचे अजब मिश्रण त्या लिखाणात आढळते.
  • त्यांना २००१ साली उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने तर २००७ साली सरस्वती सम्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
  • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७० साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.

‘ओबामाकेअर’ विधेयक मतदानात ट्रम्प पराभूत

  • अमेरिकेत ओबामाकेअर नावाने आळखले गेलेले विधेयक रद्द करण्यासाठी झालेल्या मतदानात ट्रम्प प्रशासन ४९ विरुद्ध ५१ मतांनी पराभूत झाले.
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना सवलतीच्या दरांत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ओबामाकेअर विधेयक संमत केले होते.
  • मात्र या विधेयकामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सांगत सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ते रद्द करण्याचे प्रयत्न चालवले होते.
  • ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यानही निवडून आल्यास ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याचे आश्वासन अमेरिकी मतदारांना दिले होते.
  • या विधेयकाबाबत अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ३ सिनेटरनी विरोधात मतदान केल्याने ट्रम्प यांचा पराभव झाला.
  • ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष साधारणपणे ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याच्या तर विरोधी डेमोक्रॅट पक्ष हे विधेयक कायम ठेवण्याच्या बाजूने होता.
  • मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जॉन मॅककेन, सुसान कॉलिन्स आणि लिसा मर्कोवस्की या तीन सिनेटरनी ओबामाकेअर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान करत बंडखोरी केली.

बीफ निर्यातीत भारत जगात तिसरा

  • अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफएओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (ओईसीडी) यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
  • या दोन्ही संस्थांनी २०१७ ते २०२६ या दशकभराचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये पुढची दहा वर्षे बीफ निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमाकांवर राहिल असेही नमूद करण्यात आले आहे.
  • गेल्या वर्षी भारतानं १.५६ मिलियन टन बीफ निर्यात केले, हेच प्रमाण येत्या काळात कायम राहिल असा अंदाज वाटतो आहे.
  • जगात जे बीफ निर्यात केले जाते त्याचा १६ टक्के वाटा येत्या दहा वर्षांमध्ये भारत उचलेल ज्याचे प्रमाण २०२६पर्यंत १.९३ मिलियन टन असेल, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • जागतिक क्रमवारीचा विचार करता, बीफ निर्यातीत ब्राझील पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे.

चालू घडामोडी : २८ जुलै

ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

  • महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे (महिको) संस्थापक आणि मराठवाड्यातील ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ८२व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
  • बारवाले यांचा जन्म २७ ऑगस्ट १९३०मध्ये हिंगोली येथे झाला. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात भाग घेतला.
  • १९४७-४८ सालात स्वतंत्र भारतात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. अन्नधान्याचा हा तुटवडा बारवाले यांना ध्येयाकडे घेऊन गेला.
  • बारवाले यांनी महिकोच्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत कृषी क्रांती घडवून आणली.
  • याशिवाय त्यांच्या या कार्यामुळे बियाणे उद्योग हे एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रच खासगी उद्योग क्षेत्राला मिळाले. त्यातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
  • या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पूरक व्यवसायांचाही विस्तार झाला. त्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती झाली.
  • बारवाले यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कपाशीच्या ‘बीटी’ वाणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य ‘मॉन्सेन्टो’ या सीड कंपनीने महिकोची निवड केली.
  • त्याच्या अतुलनिय कामगिरीबद्दल २००१साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्काराने सन्मान केला होता.
  • तसेच १९९८साली त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशन अमेरीका यांच्याकडून ‘वर्ल्ड फूड प्राईज’ या किताबाने गौरवण्यात आले होते.

नवाझ शरीफ पंतप्रधान पदावरून पायउतार

  • पनामा पेपर्स प्रकरणात, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरवले.
  • शरीफ यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
  • या निर्णयानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून, आता पंतप्रधानपदी कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • पंतप्रधानपदासाठी नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांचे नाव आघाडीवर आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.
  • याशिवाय पाकमध्ये लष्कराचे मोठे वजन असल्यामुळे, आता निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा लष्कराकडून फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.
 पार्श्वभूमी 
  • पनामा पेपर्सप्रकरणात तेहरिक ए इन्साफसोबतच काही विरोधी पक्षांनी नवाझ शरीफ यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
  • त्याच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने सहा सदस्यीय संयुक्त समिती स्थापन केली होती. १० जुलै रोजी या समितीने अहवाल सादर केला होता.
  • या अहवालात नवाझ शरीफ यांनी पैशाचा गैरवापर करत लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
  • या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने एकमताने शरीफ यांना दोषी ठरवत ते पंतप्रधानपदासाठी अपात्र असल्याचा निर्णय दिला.
  • ‘गॉडफादर’ आणि ‘पंजाबचे सिंह’ म्हणून ओळखले जाणाऱ्या शरीफ यांची राजकीय कारकीर्द यामुळे पणास लागली आहे.
  • न्यायालयाने शरीफ यांच्यासह मुले हसन, हुसैन, मरियम यांनाही दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात दाखल प्रकरणांची चौकशी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो अर्थात ‘नॅब’कडे सोपवली आहे.
  • सुनावणी सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या प्रकरणी निकाल द्यावा, असे आदेशही नॅबला देण्यात आले आहेत.
 अपूर्ण कालावधीचा इतिहास 
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाज शरीफ हे तिसऱ्यांदा आपला पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.
  • सर्वाधिक वेळा पंतप्रधानपदावर येऊनही सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष, मग लष्करी राजवट आणि आता न्यायसंस्था यांच्या कारवाईमुळे त्यांना पद सोडावे लागले.
  • नवाज शरीफ हे पाकिस्तानमधील राजकारणात सर्वांत प्रभावी असलेल्या शरीफ कुटुंबाचे आणि सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख आहेत.
  • १९९० ते १९९३ या काळात सर्वप्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते. या काळात देशाचे अध्यक्ष गुलाम इशाक खान यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. 
  • खान यांनी आपले अधिकार वापरत संसदच बरखास्त केली. त्यामुळे लष्कराच्या दबावाखाली येत शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला.
  • त्यानंतर १९९७ला ते पुन्हा या पदावर निवडून आले. मात्र, १९९९मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी बंड करत शरीफ यांना पदावरून हटविले.
  • पाकिस्तानमधील लष्करशाही जाऊन राजकीय स्थैर्य निर्माण झाल्यानंतर ५ जून २०१३ला शरीफ पुन्हा पंतप्रधान झाले.
  • यंदा ते कार्यकाळ पूर्ण करण्याची शक्यता असतानाच पनामा पेपर्स प्रकरण उद्भवले आणि या प्रकरणातच त्यांच्या या कादकिर्दीचा अंत झाला.
  • पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
  • त्यांना लष्कराचे बंड, न्यायालयाचे आदेश, पक्षातून हकालपट्टी अथवा हत्या या कारणांमुळे पंतप्रधानांचा कार्यकाळ कायम अपूर्णच राहिला आहे.
 न्यायालयाने अपात्र ठरविले दुसरे पंतप्रधान 
  • पाकिस्तानच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा पंतप्रधानांना पदासाठी अपात्र ठरविले आहे.
  • यापूर्वी २०१२मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने युसूफ रझा गिलानी यांना अपात्र ठरविले होते.
  • तत्कालीन अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश मानण्यास गिलानी यांनी नकार दिला होता.

ॲक्सिस बँकेत शिखा शर्मा यांची पुनर्नियुक्ती

  • ॲक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली.
  • शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला.
  • नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.

चालू घडामोडी : २७ जुलै

डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • २७ जुलै रोजी अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पैकरांबु या त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारले आहे. या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
  • तमिळनाडू सरकारने दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे.
  • अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात ‘अग्नी’ क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत.
  • यावेळी मोदींच्या हस्ते ‘कलाम संदेश वाहिनी’ बसचेही उद्घाटन करण्यात आले. या बसमध्ये कलम यांच्याशी संबंधित गोष्टींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
  • ही बस देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करत, १५ ऑक्टोबर म्हणजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती भवनात पोहोचले.
  • १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती.
  • कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
  • २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार

  • २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
  • लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
  • त्यानंतर लगेच भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-जदयू समीकरण जुळले असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणित एनडीएचे सरकार स्थापन झाले.
  • राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत, तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 
  • नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती.
  • त्यांनी भाजपा-जदयूच्या १३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले व त्यानंतर शपथविधी सकाळी पार पडणार असल्याचे जाहीर केले.
  • बिहारमध्ये जदयूचे ७१ आणि भाजपा व मित्रपक्षांचे ५८ आमदार असून, जदयू आणि भाजपा आघाडीचे मिळून १२९ आमदार होतात. 
  • बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज असून, लालू आणि काँग्रेस यांचे मिळून केवळ १०७ आमदार होतात.
  • त्यामुळे लालूप्रसाद यांचा ८० आमदार असलेला राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२
पक्ष जागा
राष्ट्रीय जनता दल (राजद) ८०
जनता दल यूनायटेड (जदयू) ७१
काँग्रेस २७
भाजप (विरोधी पक्ष) ५३
सीपीआय
लोक जनशक्ती पार्टी
राष्ट्रीय लोक समता पार्टी
हिंदुस्तानी अवाम मोर्चा
अपक्ष
एकूण २४३

बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता

  • महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
  • यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
  • शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
  • बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 
 बैलगाडी शर्यतीबद्दल 
  • बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो.
  • सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
  • खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
  • विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.
 पार्श्वभूमी 
  • पशुप्रेमी संघटनांच्या मागणीनंतर, तामिळनाडूमध्ये बैलांचा जलिकट्टु हा खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यती यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती.
  • पशुंना या खेळांमध्ये क्रूर वागणूक दिली जाते, असा त्या संघटनांचा आक्षेप होता.
  • मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर जलिकट्टू खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले होते.
  • त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करता याव्यात, यासाठी विधानसभेत पशु क्रुरता प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले होते.
  • या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले. त्यामुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेकडून रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध

  • अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.
  • हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले असले, तरी या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. 
  • रशियावर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे आणि युक्रेन व सीरियावर केलेले लष्करी आक्रमण याबद्दल हे निर्बंध लादले आहेत. तर इराणवर दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल निर्बंध घातले आहेत.

जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

  • ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत २०१३ पासून प्रथम स्थानी असलेले मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना बिजोस यांनी मागे टाकले.
  • अॅमेझॉन कंपनीच्या स्टॉक्समध्ये आलेल्या तेजीमुळे बिजोस यांनी बिल गेट्स यांना मागे टाकल्याचे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • गेल्या वर्षभरात सर्वात जलदगतीने संपत्तीत वाढ होणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक अशी बिजोस यांची ओळख आहे. वर्षभरात बिजोस यांची संपत्ती २४.५ अब्ज डॉलरनी (१.२५ लाख कोटी रुपये) वाढली आहे.

चालू घडामोडी : २६ जुलै

नितीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी २६ जुलै रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
  • संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
  • त्यानुसार नितीश कुमार राजभवनात जाऊन बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. 
  • गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
  • त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.
  • मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती.
  • त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मुख्यमंत्रिपद सोडून सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
  • बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू) आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचे सरकार स्थापन केले होते.
  • परंतु नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे या महागठबंधनाचा अंत झाल्याचे मानले जात आहे. आता बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन केले जाईल.
  • यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणे अशक्य आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२
पक्ष जागा
राष्ट्रीय जनता दल (राजद) ८०
जनता दल यूनायटेड (जदयू) ७१
काँग्रेस २७
भाजप (विरोधी पक्ष) ५३
सीपीआय
लोक जनशक्ती पार्टी
राष्ट्रीय लोक समता पार्टी
हिंदुस्तानी अवाम मोर्चा
अपक्ष
एकूण २४३

बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी

  • महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
  • यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
  • शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
  • प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न चालू होते.
  • बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 
  • विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता. यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास ३ वर्षे तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती.
  • पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मांडले होते.
 बैलगाडी शर्यतीबद्दल 
  • बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो.
  • सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
  • खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
  • विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.

भारताला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद

  • आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या तसेच २०२१मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला.
  • आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मॉस्को येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • यामुळे भारत प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे.
  • भारताने यापूर्वी कधीच पुरुष विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही. २००६मध्ये महिला चॅम्पियनशिपचे भारतात आयोजन केले होते.
  • भारताने यापूर्वी मुंबईत १९९०मधील विश्वकरंडक आणि दिल्ली येथे २०१० राष्ट्रकुल अजिंक्यपद या दोनच पुरुषांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
  • भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रशासकीय गोंधळामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
  • या पार्श्वभूमीवर, या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला मिळणे ऐतिहासिक मानले जात आहे.
  • एआयबीए कार्यकारी समितीने २०१९च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्राबजोनला तर पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद रशियातील सोच्चीला बहाल केले आहे.
  • जागतिक स्पर्धेचा विचार करायचा झाला, तर भारताने पुरुष बॉक्सिंगमध्ये एकूण ३ पदके पटकावली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके आहेत.
  • पदकविजेत्या भारतीय बॉक्सरमध्ये विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णा (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांचा समावेश आहे.
  • तर महिलांमध्ये मेरी कोम हिने पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवून आपला ठसा उमटवला आहे.

विमानांमध्ये हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिकांची सक्ती

  • नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे केले आहे.
  • प्रवाशांना हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. 
  • विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध  करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल.

दिनविशेष : कारगिल विजय दिवस

  • कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १८ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला.
  • भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
  • ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते. 
  • प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.
  • तेव्हापासून भारतीय लष्कराच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणारा २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक: तुषार अरोठे

चालू घडामोडी : २५ जुलै

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
  • विज्ञानातील कठीण गोष्टी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या.
  • यशपाल हे दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेत ‘विज्ञान गुरू’च्या भूमिकेत होते. या माध्यमातून ते विज्ञान आणि निसर्गातील अनेक रहस्यांची उकल ते रंजक पद्धतीने करत.
  • पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर १९२६ रोजी प्रा.यशपाल यांचा जन्म झाला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
  • त्यांनी भौतिकशास्त्रात १९४९मध्ये पदवी तर १९५८मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएचडीही मिळवली होती.
  • केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्येही कार्य केले. 
  • यशपाल यांनी प्रा.पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) महत्त्वाचे काम केले.
  • १९७३मध्ये यशपाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अॅप्लीकेशन सेन्टरमध्ये दाखल झाले. तेथे यशपाल यांच्या गटाला सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट उर्फ साईट कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती.
  • त्यांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सेटलाईटद्वारा करण्याचा उपक्रम राबविला होता.
  • १९८१ साली ते दोन वर्षांकरिता युनेस्कोमध्ये यूएन कॉन्फरन्स ऑन आऊटर स्पेसचे प्रमुख बनले.
  • १९८३-८४ दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सचिव झाले.
  • १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले. या काळात त्यांनी भारतभर चार अंतर विद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. २००७-१२ दरम्यान ते जेएनयूच्या कुलपतीपदी होते.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या तत्कालीन भारत जन विज्ञान जाथा या भारतव्यापी कार्यक्रमाचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते.
  • विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६मध्ये पद्मभूषण तर २०१३मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

महिला व बालविकास मंत्रालयाचे ‘शी-बॉक्स’ पोर्टल

  • नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्याच्या तक्रारी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ हे पोर्टल सुरू केले.
  • या पोर्टलवर केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना लैंगिक छळ होत असल्यास तक्रारी करता येतील.
  • लवकरच यात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत असलेल्या महिलांनाही समाविष्ट केले जाईल असे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी जाहीर केले.
  • याशिवाय नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाण किती आहे याची देशव्यापी पाहणी करण्यात येणार आहे.
  • लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन मंच उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती.
  • सद्यस्थितीला नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या गुन्ह्यांची नोंद घेण्याची कुठलीही केंद्रीभूत व्यवस्था नाही.
  • राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
  • २०१५च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात दाखल झाले त्यात ७१ लोकांवर आरोपपत्रे ठेवण्यात आली तर एकूण ५ जणांना शिक्षा झाली.

प्रोजेक्ट ७५ इंडिया

  • नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक पाणबुडी निर्मितीच्या प्रकल्पावर पुन्हा काम सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • या संबंधित करार पूर्णत्वास गेल्यास, तो संरक्षण भारताचा आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा करार असेल.
  • रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्वीडन आणि स्पेन या सहा देशांच्या मदतीने भारत सहा अत्याधुनिक पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे.
  • या प्रकल्पाला केंद्र सरकारने प्रोजेक्ट ७५ इंडिया (पी-७५ आय) असे नाव दिले आहे. या प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 
  • पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती लक्षात घेऊन या प्रकल्पाला गती देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
  • या कराराला नोव्हेंबर २००७ मध्येच संमती देण्यात आली आहे. मात्र अद्याप या करारांतर्गत कोणत्याही पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली नाही.
  • सहा अत्याधुनिक पाणबुड्यांच्या उभारणीचा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती

  • संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे एस केहर यांच्याकडून शपथ ग्रहण केल्यानंतर रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती बनले आहेत.
  • बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये १६ वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.
 राष्ट्रपती भवन 
  • राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती भवनातील मुक्काम सुरु झाला.
  • राष्ट्रपती भवनात सुमारे तीनशेहून अधिक खोल्या असून साडेसातशेहून अधिक कर्मचारी आहेत.
  • राष्ट्रपती भवनाची निर्मिती ब्रिटिश वास्तूरचनाकार सर एडविन लुटियन्स आणि हरबर्ट बेकर यांनी केली होती.
  • राष्ट्रपती भवन ३३० एकरवर उभारण्यात आलेले आहे. १९१३मध्ये या वास्तूच्या उभारणीला सुरुवात झाली.
  • या वास्तूच्या निर्मितीसाठी १६ वर्षांचा कालावधी लागला. २३ हजारांपेक्षा अधिक मजुरांनी अथक मेहनत करुन या वास्तूची निर्मिती केली.

आयसीसी विश्वचषक संघाच्या कर्णधारपदी मिताली राज

  • आयसीसीने जाहीर केलेल्या महिला विश्वचषक (२०१७) संघाच्या कर्णधारपदी भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची निवड करण्यात आली आहे. 
  • विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संघातील निवडक खेळाडूंची आयसीसीच्या १२ सदस्यीय संघात निवड होत असते.
  • मिताली राजने या संपूर्ण स्पर्धेत ४०९ धावा केल्या. यात न्यूझीलंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यात केलेली शतकी खेळीचा समावेश आहे.
  • मिताली राज व्यतिरीक्त भारतीय संघातील हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा या खेळाडूंचाही आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आला आहे.
  • याव्यतिरीक्त मालिकावीराचा किताब पटकावणारी इंग्लंडची टॅमसिन बेमाँटसह पाच इंग्लिश महिला क्रिकेटपटूंचा या संघात समावेश आहे. 
  • याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूला या संघात जागा मिळाली आहे.

तमिळनाडूच्या शाळांमध्ये वंदे मातरम्‌ अनिवार्य

  • तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे.
  • याशिवाय सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग आदींमध्येही महिन्यातून एकदा वंदे मातरम्‌ वाजविणे व गाणे बंधनकारक केले आहे.
  • वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
  • राष्ट्रगीताचा तमिळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला न्यायालयाने दिली आहे.
  • वंदे मातरम्‌ गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही, पण त्यासाठी वैध कारण असायला हवे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी जन-गण-मन हे राष्ट्रगीत देशभरातील सर्व सिनेमाघरांमध्ये वाजवणे तसेच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.   

 ‘थ्री थाऊजंड स्टीचेस’ पुस्तकाच्या लेखिका: इन्फोसिस फाऊंडेशच्या अध्यक्षा सुधा मूर्ती 

चालू घडामोडी : २४ जुलै

इस्रोचे माजी प्रमुख यू आर राव यांचे निधन

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू आर राव यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ८५व्या वर्षी बंगळुरूमध्ये निधन झाले.
  • इस्रोच्या शासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून राव कार्यरत होते. तसेच, ते तिरुअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरूही होते.
  • राव यांनी १९७२साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदार घेतली होती. भारताचा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते.
  • उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात १० मार्च १९३२ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
  • त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
  • त्यानंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात अध्यापन केले.
  • १९६६ मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
  • १९८४ ते १९९४ या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.
  • ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, ॲपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
  • राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने प्रतिष्ठित ‘दि २०१६ आईएएफ हॉल ऑफ फेम'मध्येही समावेश केला होता.
  • वॉशिंग्टन येथे २०१३मध्ये ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.
  • अंतराळ क्षेत्रातील राव यांनी दिलेल्या योगदानाबाबत १९७६साली त्यांचा पद्मभूषण तर २०१७मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  • याशिवाय इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार, युरी गागारिन पुरस्कार असे असंख्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

भारताला नमवून इंग्लंड विश्वविजेता

  • महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पहिल्या विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. 
  • मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाला महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
  • भारतावर मात करत इंग्लंडने चौथ्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली. इंग्लंडने याआधी १९७३, १९९३ आणि २००९ मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
  • प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले.
  • मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही.
  • अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला.

नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन

  • मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहीमेअंतर्गत आता सुपर कॉम्प्युटर भारतात तयार होणार आहेत.
  • नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन अंतर्गत या देशी सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीचे काम पुण्यातील सीडॅककडे सोपवण्यात आले आहे.
  • ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेला गेल्या वर्षी मार्चमध्ये मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने मान्यता दिली होती.
  • यानुसार योजेनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये ५० सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती करण्याचे ध्येय आहे. हे सुपर कॉम्प्युटर परमपेक्षाही जास्त वेगवान असतील.
  • सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये हायस्पीड इंटरनेट स्विच आणि कॉम्प्यूट यासारख्या उपकरणांची भारतात डिझाईन आणि निर्मिती करण्यात येणार आहे.
  • या सुपरकॉम्प्युटरचा आराखडा, त्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची निर्मिती आणि ते जोडण्याचे काम सी-डॅक करणार आहे.
  • सुपर कॉम्प्युटरच्या या योजनेवर विज्ञान आणि प्रोद्योगिक मंत्रालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवतील.
  • हे सुपर कॉम्प्युटर देशभरातील विविध वैज्ञानिक संस्थांना देण्याचा सरकारचा मानस आहे. 

प्रणॉयला युएस ओपनचे विजेतेपद

  • भारताच्या एच एस प्रणॉयने भारताच्याच परुपल्ली कश्यपवर मात करत अमेरिकन ओपन ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. 
  • प्रणॉयने २१-१५, २०-२२, २१-१२ अशा सरळ सेट्समध्ये परुपल्ली कश्यपला पराभूत केले.
  • प्रणॉयचे कारकिर्दीतील हे तिसरे ग्रांप्री गोल्ड जेतेपद आहे. त्याने २०१४मध्ये इंडोनेशिया मास्टर्स व २०१६मध्ये स्वीस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
  • २०१०च्या युथ ऑलिंपिकमध्ये प्रणॉयने रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर २०१४मध्ये व्हिएतनाम ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पाकिस्तानला रशियाने एमआय-१७१ई हेलिकॉप्टर दिले

  • पाकिस्तानला युद्धासाठी नसलेले (नॉन-कॉम्बॅट) प्रकारचे रशियन बनावटीचे एमआय-१७१ई हेलिकॉप्टर मिळाले आहे.
  • या वर्षात पाकिस्तानला रशियाकडून मिळालेले हे असे दुसरे हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर पाकच्या अशांत बलुचिस्तानात प्रांतासाठी मागवण्यात आले आहे.
  • एमआय-१७१ हे एमआय-१७ लष्करी मालवाहतूक हेलिकॉप्टरचा नागरी प्रकार असून ते याआधीच पाकिस्तानी लष्कराच्या सेवेत आहे.
  • एमआय-१७१ हेलिकॉप्टर प्रवासी किंवा मालवाहतूक, वैद्यकीय, शोध व बचावकार्य अशा कुठल्याही मोहिमेत उत्तम कामगिरी बजावते.
  • हे हेलिकॉप्टर ‘कन्व्हर्टिबल’ पर्यायात तयार करण्यात आले असून, २७ प्रवासी आणि ४ टनांपर्यंतचे वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
  • मालवाहतुकीसाठी असलेल्या त्याच्या कॅबिनचे रूपांतर फार कमी वेळात १३ सीट्स व एक फ्लाइट अटेन्डंट असलेल्या व्हीआयपी कॅबिनमध्ये होऊ शकते.
  • तसेच यामधील सीट्स काढून टाकल्यास १४ स्ट्रेचर्स वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे या हेलिकॉप्टरचा वापर रुग्णवाहिका म्हणूनही करता येऊ शकतो.
  • रशियन हेलिकॉप्टर्सने या हेलिकॉप्टरच्या पुरवठय़ाचा करार बलुचिस्तान प्रांताच्या सरकारशी डिसेंबर २०१६मध्ये केला होता.

चालू घडामोडी : २३ जुलै

दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी

  • युएस स्टेट डिपार्टमेंटद्वारे केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत सर्वेक्षणानुसार दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
  • जगभरात इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतात झाले आहेत. याआधी तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान होता.
  • युएस स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मरणाऱ्यांची आणि जखमींची संख्या पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त आहे. 
  • २०१६ या वर्षासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले असून, या वर्षभरात जगभरात ११,०७२ दहशतवादी हल्ले घडविण्यात आले.
  • यामध्ये भारतात ९२७ (१६ टक्के) दहशतवादी हल्ले झाले. २०१५मध्ये भारतात हीच संख्या ७९८ होती.
  • २०१५मध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या ५००च्या आसपास होती. तर २०१६मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या ६३६ इतकी झाली.
  • २०१६मध्ये भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत. 
  • या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. २०१५मध्ये पाकिस्तानमध्ये १०१० दहशतवादी हल्ले झाले होते, तर २०१६मध्ये ७३४ हल्ले झाल्याची नोंद आहे. 
  • या सर्वेक्षणानुसार, जगभरातील सर्वाधिक घातक संघटनांच्या यादीत इसिस, तालिबान आणि नक्षलवादी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी टी आर झेलियांग

  • अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नागालँडच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले टी आर झेलियांग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
  • ६० सदस्यीय विधानसभेत त्यांनी ४७ मते मिळवली. माजी मुख्यमंत्री शुऱ्होझेली लिझेत्सु यांच्या बाजूने ११ जणांनी मतदान केले.
  • झेलिआंग यांच्या बाजूने एनपीएफच्या ३६ जणांनी, भाजपच्या ४ जणांनी आणि ७ अपक्षांनी मतदान केले.
  • यापूर्वी १९ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री शुरहोजेली लीजित्सू यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल पी बी आचार्य यांनी दिला होता.
  • परंतु लीजित्सू आणि त्यांचे सहकारी सभागृहात अनुपस्थित राहिल्यामुळे झेलियांग यांना नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले होते.

हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे निधन

  • ‘होम अलोन’ या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेले हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे २१ जुलै रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
  • ‘होम अलोन’ या सिनेमात जॉन यांनी केविन मॅककॅलिस्टर या मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका वठवली होती.
  • १९७० पासून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली होती. १९९० मध्ये आलेला ‘होम अलोन’ या सिनेमाने हा अभिनेता घराघरात पोहोचला.
  • जॉन हर्ड यांनी कटर्स वे, सीएचयूडी अॅण्ड ग्लॅडिएटर या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
  • १९९९ मध्ये टिव्ही सिरीज ‘द सोप्रानोज’मधील त्यांच्या उत्तम अभिनयाबद्दल जॉन हर्ड यांना अॅमी पुरस्कारही मिळाला होता.

लिंकिंग पार्कचा गायक चेस्टर बेनिंग्टनची आत्महत्या

  • अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने २० जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • नंब आणि समव्हेअर आय बिलॉन्ग या गाण्यांमुळे त्याने जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
  • लिंकिंग पार्क या म्युझिक बॅण्डमधून बेनिंग्टनने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या बॅण्डने तयार केलेला हायब्रीड थिअरी हा अल्बम प्रचंड गाजला होता.
  • त्यानंतर मेटेओरा, वन मोर लाईट, लिविंग थिंग्स, अ थाउझंट सन यांसारख्या संगीत अल्बमची त्यांनी निर्मिती केली.
  • त्याने २००५ साली त्याचा स्वतःचा ‘डेड बाय सनराईझ’ नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. या बॅण्डचा पहिला अल्बम ‘आऊट ऑफ ॲशेस’ २००९ साली रिलीज झाला.
  • यशाच्या शिखरावर असताना बेनिंग्टन अंमली पदर्थांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता दिवसेंदिवस खालावत गेली.
  • चेस्टरच्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज कॅलिफोर्निया पोलिसांनी वर्तवला आहे.

चालू घडामोडी : २२ जुलै

पंतप्रधान वय वंदना योजना

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान वय वंदना योजनेचा (पीएमव्हीव्हीवाय) २१ जुलै रोजी शुभारंभ केला.
  • ही एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) असून, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
  • ही योजना भारतीय जीवन वीमा अर्थात एलआयसीकडून ऑफलाईन तसेच ऑनलाईनेही खरेदी करता येणार आहे.
  • ही योजना १० वर्षाला ८ ते ८.३ टक्के प्रतिवर्ष दराने पेन्शन सुनिश्चित करते. तसेच या योजनेला सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
  • १० वर्षाच्या या योजनेअंतर्गत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक कालावधीत पेन्शन मिळू शकणार आहे.
  • ही पेन्शन फक्त पुढील १० वर्षांकरिता गॅरेटेंड मिळणार असून, ही पेन्शन स्कीम ४ मे २०१७ ते ३ मे २०१८ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे.
  • आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
  • व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.
  • दहा वर्षांच्या कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तिवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल.
  • या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शन खरेदीची पूर्ण रक्कम कुठलीही वजावट न करता लाभार्थ्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल.
  • पेन्शन चालू असताना पैशांची गरज लागल्यास तीन वर्षांनंतर पेन्शन खरेदीच्या ७५ टक्के इतकी रक्कम कर्ज मिळू शकते अर्थात त्याकरिता लागू असलेला व्याजदर द्यावा लागेल.
  • याशिवाय मुदतीआधीही या योजनेतून बाहेर पडता येऊ शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल.
  • या योजनेत पूर्ण कुटुंबाकरिता पेन्शन खरेदीची कमाल मर्यादा ७.५० लाख रुपये ही आहे. यात पती/पत्नी (ज्येष्ठ नागरिक) व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश आहे.
  • थोडक्यात एकाच कुटुंबात पती-पत्नी दोघांना पेन्शन पाहिजे असेल पती ३.५० लाख तर पत्नी ४ लाख रुपये गुंतवू शकते.
  • दरमहा १ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी १.५० लाख, तर ५ हजार रुपये मिळविण्यासाठी ७.५० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. 

डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार

  • इबोला, झिका यांसारख्या नवीन विषाणुजन्य रोगांचे संशोधन करणारे डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना प्रतिष्ठेचा आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • त्यांनी वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधून निदान करण्याच्या शोधलेल्या चाचणीसाठी त्यांना आफ्रिकेचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार देण्यात आला.
  • त्यांच्या या चाचणीद्वारे अवघ्या एक तासात विषाणू कुठल्या रोगाचा आहे ते समजते. ही चाचणी सोपी व कमी खर्चीक आहे.
  • आफ्रिकेसारख्या अप्रगत देशांतील दूरस्थ भागातील लोकांसाठी या चाचणीचा वापर केला जात आहे.
  • त्यांच्या या विषाणूशोधन चाचणीचा व्यावसायिक वापर सुरू होईल, तेव्हा ती रोगनिदानातील मोठी क्रांती असेल.
  • बर्लिनमधील हुम्बोल्ट विद्यापीठातून न्यान यांनी वैद्यक शाखेची पदवी घेतली. नंतर ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या संस्थेतून त्यांनी वैज्ञानिक म्हणून प्रशिक्षण घेतले. संसर्गजन्य रोगातील निदानात ते निष्णात मानले जातात. 
  • रक्तातील संसर्गातून एचआयव्ही, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी, हेपॅटिटिस इ, डेंग्यूचा विषाणू, नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू पसरतात. ते सगळे विषाणू ओळखण्याची एकच सर्वसमावेशक चाचणी त्यांनी शोधून काढली.
  • त्यांनी हेपॅटिटिस बी विषाणूच्या निदानावर केलेले संशोधन ‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
  • लायबेरियात इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा तेथील इबोला आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे ते प्रमुख होते.
  • आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनद्वारे आफ्रिकेतील नवप्रवर्तक संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार देण्यात येतो.
  • स्वित्झर्लंडमधील दानशूर उद्योजक जीन क्लॉद बॅस्टॉस द मोराइस यांनी आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली.

संजय कोठारी नव्या राष्ट्रपतींचे सचिव

  • देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव म्हणून ‘पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्शन बोर्डा’चे अध्यक्ष संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची तर वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे.
  • कोठारी हे १९७८च्या आयएएस बॅचचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरदेखील विविध पदांवर काम केले आहे.

चालू घडामोडी : २१ जुलै

डेविड ग्रासमन यांना मॅन बुकर पुरस्कार

  • १४ जून २०१७ रोजी मॅन बुकर फाउंडेशनकडून लंडन (ब्रिटन) येथे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार डेविड ग्रासमन यांना दिला गेला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले इस्रायली लेखक आहेत.
  • डेविड ग्रासमन यांना हा पुरस्कार ‘ए हॉर्स वॉक्स इनटू ए बार’ (A Horse Walks into a Bar) या कांदबरीसाठी दिला गेला.
  • या कांदबरीचे अनुवादक जेसिका कोहेन (अमेरिका) आणि प्रकाशक जोनाथन केप आहेत. लेखक आणि अनुवादक या दोघाना प्रत्येकी २५,००० पौंड अशी पुरस्काराची रक्कम विभागून देण्यात आली
 मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१७साठी निवड झालेल्या इतर कांदबऱ्या 
  • कम्पास (Compass) ( लेखक: मेथियॉस एनार्ड (फ्रांस))
  • द अनसीन (The Unseen) (लेखक: रॉय जैकबसन (नॉर्वे))
  • मिरर, शोल्डर, सिग्नल (Mirror, Shoulder, Signal) (लेखक: डॉर्थी नॉर्स (डेनमार्क))
  • जुडॉस (Judas) (लेखक: अमोस ओज (इस्राइल))
  • फीवर ड्रीम (Fever Dream) (लेखक: सामंता श्वेबलिन (अर्जेंटीना))
 मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 
  • जागतिक स्तरावर सृजनात्मक लेखन करणाऱ्या लेखक व लेखिकेचा गौरव करण्यासाठी २००५ सालापासून दर २ वर्षानी हा पुरस्कार देण्यात येतो 
  • २०१६या वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार लेखकाबरोबरच त्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादकालाही देण्यात येतो.
  • २०१६मध्ये हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या हॉन-कांग यांना द वेजेटेरियन (The Vegetarian) या पुस्तकासाठी दिला गेला होता. या पुस्तकाचे अनुवादक डेबोराह स्मिथ हे होते.

अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली

  • पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरोधात योग्य कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखली आहे.
  • संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
  • त्यामुळे नॅशनल डिफेन्स अॅथॉराइजेशन अॅक्ट (एनडीएए) नुसार २०१६ या आर्थिक वर्षासाठी अमेरिका पाकिस्तानला निधी देणार नाही.
  • काही दिवसांपूर्वीच अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील मदत म्हणून अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीसाठीच्या अटी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला होता.
  • आर्थिक मदत देण्यापूर्वी पाकने दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत समाधानकारक प्रगती दाखवायला हवी, अशीही अट त्यात आहे.
  • दहशतवादाला पाककडून समर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अटी टाकण्यात आल्या आहेत.

रिलायन्सची बालाजी टेलिफिल्म्समध्ये भागीदारी

  • मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आघाडीची चित्रपट व मालिका निर्माती कंपनी बालाजी टेलिफिल्म्समध्ये भागीदारी घेतली आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने बालाजी टेलिफिल्म्समध्ये ४१३.२८ कोटी रूपयांची गुंतवणूक करून २४.९ टक्के भागीदारी घेतली आहे. 
  • टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बालाजी टेलिफिल्म्सचे नाव आघाडीवर आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये बालाजी टेलिफिल्म्सने विविध भाषांमध्ये चित्रपट आणि कार्यक्रम बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
  • बालाजी टेलिफिल्म्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीमुळे इंडस्ट्रीमध्य़े मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • बालाजी टेलिफिल्म्सचे अध्यक्ष: ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर

चालू घडामोडी : २० जुलै

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

  • देशाच्या १५व्या राष्ट्रपतिपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे.
  • राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. यात ९९ टक्के आमदार-खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • या निवडणुकीत कोविंद यांना एकूण ७,०२,६४४ (६५.६५ टक्के) मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना ३,६७,३१४ (३४.३५ टक्के) मते मिळाली.
  • राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या ५० टक्यांहून अधिक मतांची आवश्यकता असते.
  • प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर, रामनाथ कोविंद हे २५ जुलैपासून राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.
 रामनाथ कोविंद 
  • १ ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरच्या पाराऊख गावात जन्मलेले कोविंद हे देशाचे १५वे (व्यक्ती म्हणून १४वे) राष्ट्रपती आहेत.
  • कोविंद हे देशाचे दुसरे दलित राष्ट्रपतीही आहेत. (पहिले: के आर नारायणन [१९९७-२००२])
  • रामनाथ कोविंद यांचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले. कानपूर ग्रामीण भागातील खानपूरमधून कोविंद यांनी १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले.
  • यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कानपूर शहरात गेले. कानपूर विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य आणि विधीचे शिक्षण घेतले.
  • वकिलीचे शिक्षण घेतल्यावर कोविंद यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी उच्च सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरु केली. 
  • केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर कोविंद देसाई यांचे खासगी सचिव झाले.
  • जनता सरकार कोसळल्यावर १९८० ते १९८३ या कालावधीत केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील स्थायी परिषदेत त्यांचा समावेश होता.
  • कोविंद यांनी १९९३पर्यंत दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. जवळपास १६ वर्षे त्यांनी वकील म्हणून काम केले.
  • दिल्लीत असताना त्यांची जनसंघाचे नेते हुकुमचंद यांच्यासोबत ओळख झाली. यामुळे कोविंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जोडले गेले.
  • १९९१मध्ये भाजपकडून घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत कोविंद राजकारणात सक्रीय झाले. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
  • त्यानंतर भाजपने कोविंद यांच्याकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या मोर्चाचे अध्यक्षपद दिले.
  • १९९४मध्ये कोविंद यांनी राज्यसभेवर पाठवण्यात आले. कोविंद यांना भाजपने दोनदा राज्यसभेवर संधी दिली. ते १२ वर्षे राज्यसभा सदस्य होते.
  • यानंतर त्यांच्याकडे बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आणि आता ते थेट देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाले आहेत.

गोळाफेकपटू मनप्रीत कौर उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

  • भारताची आघाडीची गोळाफेकपटू मनप्रीत कौर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था म्हणजेच ‘नाडा’ने केलेल्या उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळलेली आहे.
  • आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चीनमध्ये मनप्रीत कौरच्या लघवीचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले होते.
  • या तपासणीत स्टिम्युलेंट डायमिथाईल ब्युटाईल अमाईन या उत्तेजकाचे नमुने सापडल्याचे समोर आले आहे.
  • मनप्रीतच्या पटियाला येथील हॉस्टेलवर धाड टाकली असतानाही नाडाच्या अधिकाऱ्यांना याच उत्तेजकांचे नमुने आढळले होते.
  • सलग दुसऱ्या चाचणीत मनप्रीत दोषी आढळल्याने मनप्रीतवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
  • पुढील चौकशी होईपर्यंत मनप्रीतला लंडन येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघातूनही वगळ्यात आले आहे.
  • नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत मनप्रीत कौरने गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
  • उत्तेजक सेवन प्रकरणात आता मनप्रीत कौरची चौकशी करण्यात येणार आहे, त्यात मनप्रीतला आपलं निर्दोषत्व सिद्ध करावे लागणार आहे. असे न झाल्यास मनप्रीत कौरचे सुवर्णपदकही काढून घेण्यात येईल.
  • मनप्रीतने चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्समध्ये १८.८६ मीटर गोळाफेक करीत लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी पात्रता सिद्ध केली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

  • आकाशगंगा, भालू, आम्ही जातो अमुच्या गावा, प्रेमासाठी वाट्टेल ते अशा मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे १९ जुलै रोजी निधन झाले.
  • साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते.
  • कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते.
  • लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते. त्यांचे मूळ नाव अनसुया साक्रीकर होते. त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते.  
  • त्यांनी स्वत:ची श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू करून चित्रनिर्मिती केली. भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार हे चित्रपट त्यांनी बनविले.
  • त्यांनी भालजी पेंढारकर, वसंत जोगळेकर, राजदत्त, माधवराव शिंदे, कमलाकर तोरणे, मुरलीधर कापडी, हिंदीत सत्येन बोस अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले.
  • ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • २०१२ साली उमा भेंडे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पाकिस्तान दहशतवाद्यांच्या आश्रयदाता

  • अमेरिकी परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश दहशतवाद्यांच्या आश्रयदाता देशांच्या यादीत करण्यात आला आहे.
  • पाकिस्तान व्यातिरिक्त अफगाणिस्तान, सोमालिया, विस्तीर्ण सहारा, सुलू, सुलावेसी, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे देशही दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत आहेत.
 या अहवालातील ठळक मुद्दे 
  • २०१६मध्ये पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांनी मोठय़ा प्रमाणात प्रशिक्षण शिबिरे चालवली, तसेच विविध मार्गानी निधीसंकलनही केले पाकिस्तानातील सरकारने मात्र त्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक केली.
  • पाकिस्तानने अफगाण तालिबान किंवा हक्कानी गटाविरोधात परिणामकारक कारवाई करण्यास टाळाटाळ केली.
  • पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबावर बंदी घातली असली तरी जमात-उद-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांच्या माध्यमातून ही संघटना आपला निधीसंकलनाचा उपक्रम राबवत आहे.
  • लष्कर आणि जैश या दोन्ही संघटनांनी भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या असून २०१६मध्ये पठाणकोट आणि उरी या ठिकाणी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत या संघटनांचा सहभाग होता.
  • लष्करचा म्होरक्या हाफीज सईद याच्या कारवायांकडेही पाकिस्तानी सरकारने काणाडोळा केला आहे.
  • पाकिस्तानी लष्कराने तेहरीक-ए-तालिबानसारख्या संघटनांवर कारवाई केली, परंतु त्याला मर्यादित स्वरूप होते.
  • अल कायदा, आयसिस, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमची डी-कंपनी यांच्याविरोधात संयुक्तपणे लढा देण्याचा भारत आणि अमेरिकेचा निर्धार असून त्यासाठी अमेरिका सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.

चालू घडामोडी : १९ जुलै

प्रसिध्द गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन

  • फिल्डस मेडल हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला व प्रसिध्द इराणी-अमेरिकन गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन झाले.
  • स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
  • मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. हॉर्वर्ड विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना पीएचडी प्रदान केली होती.
  • त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलंपियाडमध्ये २ सुवर्ण पदकांनी गौरवण्यात आले होते.
  • १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिर्झाखानी गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जाणाऱ्या फिल्ड्स मेडल या सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
  • भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी कोरियात सेऊल येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमेटिशियन्स या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला (एकमेव) आणि पहिल्या इराणी नागरिक आहेत.
 फिल्ड्स मेडलविषयी.. 
  • फिल्ड्स मेडल गणितातले संशोधन आणि त्या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिले जाते.
  • गणितातले नोबेल अशी या पुरस्काराची ओळख असून १९३६पासून ते प्रदान केले जातात. आतापर्यंत ५२ गणितज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे असून दर ४ वर्षानी दोन, तीन अथवा चार गणितज्ञांना हे पुरस्कार जाहीर केले जातात.
  • भारतीय वंशाच्या डॉ. मंजूल भार्गव यांनी २०१४मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

चीनने तिबेटमध्ये पाठवली लष्करी सामुग्री

  • सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
  • साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी भर पडणार आहे.
  • पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे.
  • पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. 
  • चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नथू-ला खिंडीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे.
  • चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून ७०० किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात. 
  • डोकलाम भाग भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर आहे. भूतानमध्ये येणारे डोक्लाम म्हणजे आपल्या डोंगलाँग प्रांताचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे.
  • त्यामुळे येथे भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय सैन्य मागे हटायला तयार नसल्याने चीनकडून युद्धाची भाषा केली जात आहे.

नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता

  • नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शूरहोजेली लिजित्सू बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत गैरहजर राहिले.
  • मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
  • नागालँडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष नागा पीपल्स फ्रंटमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
  • या कलहातून माजी मुख्यमंत्री टी आर झेलियांग यांनी १५ जुलै रोजी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला होता.
  • नागालँड विधानसभेत एकूण ६० आमदार असून यातील ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा झेलियांग यांनी केला होता.
  • त्यामुळे १९ जुलै रोजी विधानसभेत मुख्यमंत्री लिजित्सू यांना बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र ते विधानसभेत गैरहजर राहिले.
  • बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने लिजित्सू यांनी गैरहजर राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे.