प्रश्नसंच ६५ - [इतिहास]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या भागात सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला नाही?
१] गुजरात
२] सिंध
३] राजस्थान
४] काश्मीर

उत्तर
४] काश्मीर
------------------
[प्र.२] असत्य विधान ओळखा.
१] चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांना मारले.
२] समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हंटले जाते.
३] स्कंदगुप्ताने हुनांना पराभूत केले.
४] कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.

उत्तर
४] कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.
------------------
[प्र.३] पुष्यमित्राने कोणत्या घराण्याची स्थापना केली?
१] मौर्य
२] शुंग
३] शक
४] वाकाटक

उत्तर
२] शुंग
------------------
[प्र.४]  सिंधू संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी केव्हा होती?
१] इ.स.पू. ३५००
२] इ.स.पू. २५००
३] इ.स.पू. ५००
४] इ.स.पू. २०००

उत्तर
२] इ.स.पू. २५००
------------------
[प्र.५] रामानुज कोणत्या मंदिराचे मुख्य पुजारी होते?
१] द्वारका
२] शृंगेरी
३] पुरी
४] श्रीरंगम

उत्तर
४] श्रीरंगम
------------------
[प्र.६] 'मिताक्षरा' ग्रंथाची रचना कोणी केली?
१] पंप
२] विज्ञानेश्वर
३] बिळण
४] सोमेश्वर तिसरा

उत्तर
२] विज्ञानेश्वर
------------------
[प्र.७] चालुक्य काळातील शहरांपैकी कोणते शहर 'मंदिरांचे शहर' म्हणून ओळखले जाते?
१] बदामी
२] ऐहोळ
३] कान्हेरी
४] कल्याणी

उत्तर
२] ऐहोळ
------------------
[प्र.८] महंमद गझनीने स्वतःला खालीलपैकी कोणते शीर्षक घेतले?
१] गाझी
२] सम्राट
३] बुतशिकन
४] प्रेषित

उत्तर
३] बुतशिकन
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या सुलतानाने हक्क-इ-शर्ब नावाचा कर सुरु केला?
१] इल्तमश
२] अल्लाउद्दिन खिलजी
३] गियासुद्दीन तुघलक
४] फिरोजशाह तुघलक

उत्तर
४] फिरोजशाह तुघलक
------------------
[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] 'शहानामा' ग्रंथ फिरदौसीने लिहिला.
ब] 'नुरसीपिहर' हा ग्रंथ आमीर खुस्त्रोने ग्रंथ लिहिला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] अ आणि ब दोन्ही
-----------------------------------------------