प्रश्नसंच ५८ - [भूगोल]

[प्र.१] नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
१] आंध्रप्रदेश
२] कर्नाटक
३] केरळ
४] तामिळनाडू

उत्तर
४] तामिळनाडू
------------------
[प्र.२] स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर सर्वप्रथम बांधण्यात आले?
१] न्हावाशेवा [JNPT]
२] कांडला
३] मार्मागोवा
४] मुंब्रा

उत्तर
२] कांडला
------------------
[प्र.३] अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते?
१] पाल्क
२] जिब्राल्टर
३] मल्लाक्का
४] बिअरिंग

उत्तर
३] मल्लाक्का
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही?
१] ब्रुनेई
२] मलाया
३] सेहाद
४] सारवाक

उत्तर
१] ब्रुनेई
------------------
[प्र.५] 'इल्मेनाईट' हे खनिज उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते?
१] आंध्रप्रदेश
२] कर्नाटक
३] केरळ
४] तामिळनाडू

उत्तर
३] केरळ
[इल्मेनाईट हे Iron titanium oxide mineral आहे. जे मुख्यत्वे केरळमध्ये सापडते]

------------------
[प्र.६] खाली दिलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश मोठा आहे?
१] हो-हॅंग-हो
२] नाईल
३] इरावती
४] मिसिसीपी
 
उत्तर
२] नाईल
------------------
[प्र.७] लोकतक जलविद्युत निर्मिती क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
१] मेघालय
२] मिझोरम
३] त्रिपुरा
४] मणिपूर

उत्तर
४] मणिपूर
------------------
[प्र.८] 'शॉन'चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
१] कंबोडिया
२] थायलंड
३] व्हिएतनाम
४] म्यानमार

उत्तर
४] म्यानमार
------------------
[प्र.९] अयोग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्र हा शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य आहे.
ब] भारताला १०% कागद आयात करावा लागतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
------------------
[प्र.१०] भारताच्या इतर किनारी भागांपेक्षा सौराष्ट्राचा किनारी भाग मत्स्य व्यवसायासंबंधी कमी विकसित आहे, कारण.........................
१] तेथील किनारी भागात पाण्याची क्षारता जास्त आहे.
२] औद्योगिक विकासामुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे.
३] मत्स्य व्यवसायासंदर्भात तेथील लोकांत जागरूकता नाही.
४] तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.  

उत्तर
४] तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.
-------------------------------------------------------------