प्रश्नसंच ६९ - [इतिहास]

[प्र.१] भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात?
१] राधाकृष्णन आयोग
२] हंटर आयोग
३] वूड्सचा खलिता
४] मॅकोलेचा सिद्धांत

उत्तर
३] वूड्सचा खलिता
------------------
[प्र.२] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?
१] राजा राममोहन रॉय
२] म.गो.रानडे
३] लोकमान्य टिळक
४] गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर
२] म.गो.रानडे
------------------
[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.
ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.४] १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
१] १६ वर्षे
२] १२ वर्षे
३] १४ वर्षे
४] १८ वर्षे

उत्तर
३] १४ वर्षे
------------------
[प्र.५] तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?
१] ११९०
२] ११९१
३] ११९२
४] ११९३

उत्तर
२] ११९१
------------------
[प्र.६] नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?
१] कुतुबुद्दीन ऐबक
२] याल्दुज
३] बख्तियार खिलजी
४] घियासुद्दिन खिलजी

उत्तर
३] बख्तियार खिलजी
------------------
[प्र.७] ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने सर्वप्रथम १८१९मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
१] एल्फिन्स्टन कॉलेज
२] सेंट जॉर्ज ख्रिश्चन मिशन
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
४] मुंबई युवा स्त्री शिक्षण संस्था

उत्तर
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
------------------
[प्र.८] कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?
१] जे.इ.डी.बेथून
२] हेनरी कॉटन
३] ईश्वरचंद्र विद्यासागर
४] राजा राममोहन रॉय

उत्तर
१] जे.इ.डी.बेथून
------------------
[प्र.९] महंमद गझनीच्या दरबारी इतिहासकार कोण होता?
१] उत्बी
२] फिरदौसी
३] अल-बरुनी
४] मिन्हास सिराज

उत्तर
१] उत्बी
------------------
[प्र.१०] भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले?
१] मुलतान
२] सिंध
३] पंजाब
४] राजस्थान

उत्तर
२] सिंध
------------------------------------------------