प्रश्नसंच ५९ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे?
१] १४.९%
२] २०.१%
३] ०२.०२%
४] १८.९%

उत्तर
१] १४.९%
------------------
[प्र.२] २००९-१० मधील निकषानुसार भारताचे दरडोई प्रतिमाह ग्रामीण आणि शहरी उत्पन्न अनुक्रमे [अंदाजे] किती आहे?
१] ३०० रु. , ४०० रु
२] ५६५ रु. , ८७९ रु.
३] ६७२ रु. , ८५९ रु
४] ९५४ रु. , १००४ रु.

उत्तर
३] ६७२ रु. , ८५९ रु
------------------
[प्र.३] २००९-१० च्या सुरेश तेंडूलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?
१] ३८.२%
२] २४.५%
३] ४८.३%
४] १८.७%

उत्तर
२] २४.५%
------------------
[प्र.४] कोणत्या योजनेमध्ये बदल करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली?
१] जवाहर रोजगार योजना
२] संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
३] १ आणि २ दोन्ही
४] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

उत्तर
१] जवाहर रोजगार योजना
------------------
[प्र.५] १ एप्रिल १९९९मध्ये  सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.
१] IRDP
२] TRYSEM
३] DWCRA
४] ICDS

उत्तर
४] ICDS
------------------
[प्र.६] योग्य विधाने ओळखा.
अ] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत देशाच्या मानव विकास निर्देशांकात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत महाराष्ट्राच्या मानव विकास निर्देशांकात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
४] वरील दोन्ही
------------------
[प्र.७] सहस्त्रकालीन चिकास उद्दिष्ठासंबंधी अयोग्य विधाने ओळखा.
अ] १९९० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्म्यावर आणणे.
ब] १९९० ते २०१५ दरम्यान पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी करणे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला.
ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते.


१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.९] महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते?
अ] हस्तकला कारागिरांना मदत.
ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत.
क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] भांडवल बाजारासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] भांडवल बाजारात मध्यमकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात.
ब] या बाजारात उद्योजक व्यावसायिक या बाजारात शेअर्स, बॉन्डस वगैरे विकून भांडवलाची उभारणी
करतात.
क] भांडवल बाजार हा फक्त शुक्रवारी जिल्ह्याच्या ठिकाणी भरतो.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] फक्त अ आणि ब
----------------------------------------------------