प्रश्नसंच ६१ - [इतिहास]

[प्र.१] खालीलपैकी कोण सम्राट अशोकाचा मुलगा नव्हता?
१] तिवरा
२] कुणाल
३] जलौका
४] सुमण

उत्तर
४] सुमण
------------------
[प्र.२] आर्यभट्ट : खगोलशास्त्र : : सुश्रुत : ???
१] गणितशास्त्र
२] औषधशास्त्र
३] राज्यशास्त्र
४] अर्थशास्त्र

उत्तर
२] औषधशास्त्र
------------------
[प्र.३] 'मालविकाग्निमित्र' या नाटकाची रचना कोणी केली?
१] अग्निमित्र
२] समुद्रगुप्त
३] कालिदास
४] हर्षवर्धन

उत्तर
३] कालिदास
------------------
[प्र.४] अयोग्य जोडी ओळखा.
१] पहिली बौद्ध सभा : राजगृह
२] दुसरी बौद्ध सभा : मगध
३] तिसरी बौद्ध सभा : पाटलीपुत्र
४] चौथी बौद्ध सभा : काश्मिर

उत्तर
२] दुसरी बौद्ध सभा : मगध
------------------
[प्र.५] विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती?
१] पुरुषपूर
२] पाटलीपुत्र
३] उज्जैन
४] वाराणशी

उत्तर
२] पाटलीपुत्र
------------------
[प्र.६] गुप्त काळातील चांदीच्या नाण्यांना काय नाव होते?
१] दिनार
२] रुप्याका
३] सतमान
४] कर्शपान

उत्तर
२] रुप्याका
------------------
[प्र.७] गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्यासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे?
१] दोघेही एकाच शतकात जन्मले होते.
२] दोघेही क्षत्रिय आहेत.
३] दोघांचाही साध्या आणि नीट राहाणीमानावर विश्वास होता.
४] वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती.    

उत्तर
४] वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती.
------------------
[प्र.८] 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा उल्लेख कोणाबद्दल केला जातो?
१] गौतमीपुत्र सातकर्णी
२] सम्राट अशोका
३] हर्षवर्धन
४] विक्रमादित्य

उत्तर
१] गौतमीपुत्र सातकर्णी
------------------
[प्र.९] मौर्य साम्राज्याच्या -हासाचे खालीलपैकी कोणती कारणे सांगता येतील?
अ] अशोक राजाचे शांततेचे धोरण
ब] अशोका नंतरचे दुबळे शासक
क] परकीय आक्रमण

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] ब आणि क
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोण कोण पल्लवांचे समकालीन होते?
अ] गंग
ब] कदंब
क] चालुक्य
ड] सातवाहन

१] अ आणि ड
२] अ,ब आणि क
३] अ आणि क
४] अ,क आणि ड

उत्तर
२] अ,ब आणि क
-------------------------------------------------------------