प्रश्नसंच ७८ - [राज्यघटना]

[प्र.१] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

---------------------------
[प्र.२] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
---------------------------
[प्र.३] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

---------------------------
[प्र.४] भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी जोडण्यात आलेले मूलभूत कर्तव्य कोणते?
अ] पर्यावरणाचे रक्षण करणे.
ब] सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
क] मतदान करणे.
ड] पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.

उत्तर
ड] पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.
{८६व्या घटना दुरुस्तीने (२००२) हे कर्तव्य जोडण्यात आले}

---------------------------
[प्र.५] राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे?
अ] २४३(A)
ब] २४३(G)
क] २४३(J)
ड] २४३(K)

उत्तर
ड] २४३(K)
---------------------------
[प्र.६] दोन्ही सभागृहान्ची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते?
अ] १०६
ब] १०८
क] १००
ड] १०५

उत्तर
ब] १०८
---------------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या समितीला 'काटकसर समिती' असेही म्हणतात?
अ] अंदाज समिती
ब] लोक लेखा समिती
क] संसदीय कामकाज समिती
ड] आश्वासन समिती

उत्तर
अ] अंदाज समिती
---------------------------
[प्र.८]  एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल दोन वेळा शिक्षा करता येणार नाही असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?
अ] १९
ब] २०
क] २१
ड] २२

उत्तर
अ] १९
---------------------------
[प्र.९]  लोकसभा आणि विधानसभा यामध्ये स्त्रियांना ३३% आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
अ] १११
ब] १०८
क] ११०
ड] ११३

उत्तर
ब] १०८
{११०वी घटना दुरुस्ती- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण}

---------------------------
[प्र.१०]  लोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले?
अ] १९६७
ब] १९६८
क] १९७१
ड] १९७३

उत्तर
ब] १९६८
{२०११ पर्यंत ११ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आले होते.}

-------------------------------------------------------------