प्रश्नसंच ११५ - [राज्यशास्त्र-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]


[प्र.१] पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
१] राजस्थान आणि महाराष्ट्र
२] राजस्थान आणि आंध्रप्रदेश
३] राजस्थान आणि कर्नाटक
४] राजस्थान आणि मध्यप्रदेश

उत्तर
२] राजस्थान आणि आंध्रप्रदेश
----------------
[प्र.२] महाराष्ट्र शासनाने १९८४, या वर्षी कशासाठी प्राचार्य पी.बी.पाटील समिती नेमली होती?
१] प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी
२] ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी
३] नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्या जकाती विषयी
४] जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुधारणांविषयी

उत्तर
२] ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी
----------------
 [प्र.३] ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. त्या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१] डॉ.बी.आर.आंबेडकर
२] डॉ.राजेंद्र प्रसाद
३] डॉ.सच्चीदानंद सिन्हा
४] पंडित जवाहरलाल नेहरू

उत्तर
३] डॉ.सच्चीदानंद सिन्हा
----------------
[प्र.४] भारतातील बहुआंश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची करणे कोणती?
१] सरपंचाची उदासीनता
२] ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अनिच्छा
३] लोकांची निरक्षरता
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.५] योग्य विषाने ओळखा.
अ] महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यकाल ५ वर्षे असतो.
ब] महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
----------------
[प्र.६] भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१] फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरीकत्व मिळवले असेल.
२] कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल.
३] भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.
४] भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर
४] भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.
----------------
[प्र.७] जोड्या लावा.
अ] सरपंच                        I] ग्रामपंचायतीचे संघटन
ब] कलम ४०                    ii] ग्रामसभेची व्याख्या
क] कलम २४३                 iii] ग्रामसभेचा अध्यक्ष
ड] उपसरपंच                    Iv] सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष

१] अ-iii / ब-i / क-iv / ड-ii
२] अ-iii / ब-i / क-ii / ड-iv
३] अ-iii / ब-ii / क-i / ड-iv
४] अ-iv / ब-i / क-ii / ड-iii

उत्तर
२] अ-iii / ब-i / क-ii / ड-iv
----------------
[प्र.८] राज्यपालांचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
२] राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.
३] मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो.
४] राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार आहे.

उत्तर
४] राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार आहे.
----------------
[प्र.९] राजकुमारी अमृत कौर कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१] बिहार
२] केंद्रीय प्रांत
३] बॉम्बे
४] पंजाब

उत्तर
२] केंद्रीय प्रांत
----------------
[प्र.१०] १९२० मध्ये भारतात गिरणी कापड क्षेत्रात स्त्री काम्गार्नाची टक्केवारी किती होती?
१] १२ टक्के
२] १५ टक्के
३] २० टक्के
४] ५.५ टक्के

उत्तर
३] २० टक्के
---------------------------