चालू घडामोडी - ३० जानेवारी २०१५

·      ३० जानेवारी: हुतात्मा दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)
·      ३० जानेवारी: जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
·      अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामामहाराष्ट्र चित्ररथ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा पंढरीची वारीहा चित्ररथ सर्वोत्तम ठरला आहे.
·      राजपथावर आजवर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राला हा बहुमान एकूण सहाव्यांदा मिळाला आहे. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने सादर केलेल्या लेझीम नृत्याला प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे.
·      चित्ररथाच्या स्पर्धेत झारखंड आणि कर्नाटकच्या चित्ररथांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. झारखंडने मलुटी गावाची प्रतिकृती सादर केली होती, तर कर्नाटकने चन्नापट्टनम येथील खेळण्यांच्या उद्योगाचे दर्शन घडविले होते.
·      नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या १८० मुला-मुलींनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीम नृत्याला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.
·      आर्थिक बाबींशी संबंधित खटल्यांचा वेगाने निपटारा करण्यासाठी कायदा आयोगाने देशभर व्यावसायिक न्यायालये स्थापन करण्याचे ठरविले असून, यासंबंधीच्या विधेयकाचा मसुदा आज जाहीर करण्यात आला.
·      या न्यायालयांमध्ये केवळ नव्वद दिवसांमध्ये अर्थविषयक खटले निकाली काढले जातील. नवे व्यावसायिक न्यायालये विधेयक-२०१५’ मध्ये किमान पाच उच्च न्यायालयांच्या व्यावसायिक शाखा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
·        बेळगावात ते फेब्रुवारीपर्यंत भरणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत:
·        तर समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येतील.
·      कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करून देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार व महापालिकेला दिल्या आहेत.
·      वरळीतील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील मिडटाऊन, ऑर्किड, शुभम अर्पाटमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अर्पाटमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनधिकृत असून त्यात १४० फ्लॅट आहेत.
·      केंद्रात पर्यावरण मंत्री असतानाJayanti Natrajan माझ्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दबाव होता. अनेक प्रकल्प राहुल गांधी यांच्यामुळे रोखून ठेवावे लागले,’ असा सनसनाटी आरोप करत ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
·      काँग्रेसने नटराजन यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
·      जयंती नटराजन यांनी ३५ मोठे प्रकल्प रखडवल्याचा आरोप आहे. या प्रकल्पांची किंमत सुमारे पाच हजार कोटी होती.
·      नटराजन यांना राजीव गांधी यांनी काँग्रेसमध्ये आणले होते. नरसिंह राव यांच्या काळात त्यांनी काँग्रेस सोडून जी. के. मूपनार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तमिल मनिला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पुन्हा त्यांना स्वगृही आणले.
·        स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात दोषी ठरलेल्या महंमद आमीरवरील बंदी पाच वर्षे संपण्यापूर्वीच उठवण्यात आली.
·        आमीरची बंदी २ सप्टेंबरला संपणार होती. त्यापूर्वीच त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठी आयसीसीकडून हिरवा सिग्नल देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा