चालू घडामोडी - २२ मे २०१५


सरकारच्या कामकाजाचा अहवाल संकेतस्थळावर
    NDA Government One year completion
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात केलेल्या कामकाजाचा अहवाल विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • pib.nic.in/nda/ या संकेतस्थळावर सरकारने वर्षभरात केलेल्या कामाची मंत्रालयानुसार माहिती देण्यात आली आहे. तसेच या संकेतस्थळावर विविध छायाचित्रे, व्हिडिओज्‌, यशोगाथांचेही संकलन करण्यात आले आहे. यामाध्यमातून सरकारच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लढाऊ विमान उतरले महामार्गावर
    Miraaj 2000 Lands on Yamuna Expressway
  • भारतीय हवाई दलाचे मिराज २००० हे लढाऊ विमान यमुना मथुरेजवळ एक्सप्रेस-वेवर यशस्वीरित्या उतरले. राष्ट्रीय महामार्गांचा आपत्कालात विमान उतरविण्याकरता उपयोग होण्यासाठी केलेल्या नियमित सरावाचा हा भाग होता.
  • या सरावासाठी हवाई वाहतुकीसह रस्त्यांवरील वाहतूकही वळविण्यात आली होती. तसेच सुरक्षेचे सर्व उपाय केले गेले होते. भविष्यात आणखी अशा महामार्गांचा वापर करण्याचा विचार असल्याचे हवाई दलाने जाहीर केले.

सिध्दीविनायक मंदिराला आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र
  • मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिराला २० मे २०१५  त्याच्या सर्वोत्तम गुणवत्ता परंपरेसाठी आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र देण्यात आले. आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारे सिध्दीविनायक मंदिर हे मुंबईतील पहिलेच असे मंदिर आहे.
  • हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिध्दीविनायक मंदिराचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांना मंदिर परिसरात समारंभात प्रदान केले. हे प्रमाणपत्र मंदिराची दर्शन व्यवस्था, दुष्काळ व्यवस्थापन, राज्यात सार्वत्रिक शिक्षण अशा विविध उपक्रमांकरिता केलेल्या आर्थिक मदतीचे व्यवस्थापन केल्याबद्दल देण्यात आले आहे.
  • श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे स्थित आहे. सिध्दीविनायक मंदिर १८०१ मध्ये विठू आणि देऊबाई पाटील यांनी बांधले होते.
  • आंतरराष्ट्रीय मानक संघटना (आयएसओ)
    • आंतरराष्ट्रीय मानक संघटना (आयएसओ) विविध राष्ट्रांच्या मानक संस्थांच्या प्रतिनिधींची मिळून बनलेली एक आंतरराष्ट्रीय मानक संरचना संस्था आहे. 
    • स्थापना : २३ फेब्रुवारी १९४७
    • मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
    • सदस्य राष्ट्र : १५७

मेघालयने पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत १०० टक्के आर्थिक समावेशकतेचे लक्ष्य गाठले
  • मेघालय राज्य सरकारने  महत्त्वाकांक्षी पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत १०० टक्के आर्थिक समावेशकतेचे लक्ष्य गाठले आहे.
  • मेघालय राज्यातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये किमान एक बँक खाते उघडण्यात आले आहे. आतापर्यंत या राज्यात ५.५३ लाख कुटुंबांकरिता १.५५ लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली आहेत.
  • हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्याच्या ग्रामीण लोकसंख्येचे योगदान नागरी लोकसंख्येपेक्षा जास्त होते. राज्यातील १८ लाख बँक खाती ग्रामीण भागात तर ४७००० खाती राज्यातील शहरी भागात उघडण्यात आली.
  • पंतप्रधान जन धन योजना
    • हि योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली होती.
    • उद्देश : सहा महिन्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी किमान एक बँक खाते उघडून अर्थिक समावेशकतेचे ध्येय साध्य करणे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत औपचारिक बँकिंग प्रणाली पोहचविणे.
    • या योजनेद्वारे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अनुदानाची रक्कम गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहचविणे सहज शक्य होणार आहे व भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
    • या योजनेअंतर्गत २६ जानेवारी २०१५ पर्यंत ७.५ कोटी बँक खाते उघडण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते परंतु ते वेळेपूर्वीच साध्य झाल्यामुळे लक्ष्य वाढवून १० कोटी बँक खाती ठरविण्यात आले.

साईना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर
  • भारताची बॅडमिंटनपटून साईना नेहवाल हिने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे.
  • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्लूएफ) तर्फे २१ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत साईनाला पहिले स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात साईनाने प्रथमच क्रमवारीत पहिले स्थान मिळविण्याची कामगिरी केली होती. पण, पराभवामुळे तिला हे स्थान गमवावे लागले होते.
  • भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची घसरण होऊन ती १२व्या स्थानावर पोहचली आहे. पुरुषांच्या क्रमवारीत के. श्रीकांतने पुन्हा चौथे स्थान मिळविले आहे. तर, पी. कश्यप आणि एच. एस. प्रणॉय १३ आणि १५व्या स्थानावर आहेत.

पालमिरा शहर इसिसच्या ताब्यात
  • प्राचीन सिल्क रोडवरील व्यापारी तांड्यांचा थांबा असलेल्या ऐतिहासिक पालमिरा शहरावर इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यामुळे जागतिक वारसा यादीतील अमूल्य वास्तूंचे भवितव्य संकटात आले आहे.
  • ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी मोठ्या संख्येने पालमिरात प्रवेश केल्यामुळे सरकारी सैन्याने माघार घेतली. पालमिरातील बहुसंख्य नागरिकांचे स्थलांतरही करण्यात आले आहे.
  • इराकमधील निमरुद आणि मोसूल या ऐतिहासिक शहरांची ‘इसिस’ने आधीच नासधूस केली आहे.
  • पालमिराचे ऐतिहासिक महत्व
    • सीरियातील पालमिरा शहराला दोन हजार वर्षांचा वारसा लाभला आहे.
    • ऐतिहासिक आणि पुरातन अवशेष असलेल्या पालमिरा शहराचे वर्णन सीरियात ‘वाळवंटातील मोती’ अशा शब्दांत केले जाते.
    • पूर्वीच्या राजवटींमधील वास्तू, पुरातन कबरी आणि ग्रीक-रोमन काळातील अवशेष या शहरात आहेत. सीरियात २०११ मध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी पालमिराला दरवर्षी दीड लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत होते.

'स्टार्ट-अप'साठी मूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती
  • स्टार्ट-अप कंपन्यांना शेअर बाजारांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक नियम आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अठरा सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.
  • यासंदर्भात धोरणात्मक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी आयटी उद्योजक एन. नारायण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही १८ सदस्यीय समिती काम करणार आहे.
  • या पर्यायी गुंतवणूक धोरण सल्लागार समितीत सेबीने विविध खाजगी इक्विटी कंपन्या आणि स्टार्टअप संस्थेतील प्रतिनिधी, उद्योगातील प्रतिनिधी, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय आणि सेबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.
  • नवीन समिती स्टार्टअप आणि पर्यायी गुंतवणूक विकासासाठी संबंधित विषयांवर ‘सेबी’ला (इंडिया सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) शिफारशी देऊ शकणार आहे. शिवाय पर्यायी गुंतवणूक आणि उद्योगांच्या विकासासाठी कोणताही अडथळा निर्माण करू शकणाऱ्या बाबतीत सल्ला देऊ सेबीला सल्ला देऊ शकणार आहेत.

मैत्रेयी पुष्पा यांची हिंदी अकादमीच्या उपाध्यक्षपदी
  • दिल्ली राज्य सरकारने हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांची २० मे २०१५ रोजी हिंदी अकादमीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
  • तसेच मैथिली-भोजपुरी अकादमीच्या उपाध्यक्षपदी पत्रकार संजॉय कुमार सिंग आणि संस्कृत अकादमी उपाध्यक्षपदी प्राध्यापक गणेश दत्त शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
  • या तिन्ही अकादमींचे अध्यक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. उपाध्यक्षांचा तसेच सदस्यांचा कार्यकाल १ वर्षाचा असेल.
  • हिंदी अकादमी, दिल्ली :
    • हिंदी अकादमी, दिल्लीची स्थापना १९८१ मध्ये दिल्लीच्या प्रशासनाने एक स्वायत्त संस्था म्हणून केली.
    • या अकादमीचा मुख्य उद्देश दिल्लीमध्ये हिंदी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि विकास करणे हा आहे.

अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • भारताने स्वनिर्मित अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी २० मे २०१५ चंडीपूर, ओडिशा येथून घेतली.
  • हवेतूनवरून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने केली आहे.
  • या क्षेपणास्त्राचा वेग १.२ मॅक ते १.४ मॅक असून हे एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे.
  • या क्षेपणास्त्राची १५ किलोची पारंपारिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • हि चाचणी सुखोई-३० MKI या विमानावरून घेण्यात आली आहे.
  • हे भारताचे पहिले बियॉंड विज्युअल रेंज (दृष्टी पलीकडील) क्षेपणास्त्र असून ते कोणत्याही हवामानात शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेऊ शकते.

तथागत रॉय त्रिपुराचे १६वे राज्यपाल
  • २० मे २०१५ रोजी तथागत रॉय यांनी त्रिपुराचे १६वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे.सी. दिपक गुप्ता यांनी राज्यघटनेचे कलम १५९ नुसार तथागत रॉय यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
  • नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य राज्यपाल यांच्यावर त्रिपुरा राज्याच्या अतिरिक्त राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तथागत रॉय बालकृष्ण आचार्य यांची जागा घेतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा