चालू घडामोडी : ६ मार्च

सहाव्यांदा आशिया चषकावर भारताचे नाव

  • शिखर धवनच्या आक्रमक ६० धावा त्याला विराट कोहलीने ४१ धांवाची दिलेली संयमी साथ आणि धोनीच्या झटपट २० धावांच्या बळावर भारताने बांगलादेशला ८ गड्यांनी हरवत सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.
  • शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने ठेवलेल्या १२१ धावांचा भारताने यशस्वी पाठलाग करत विजेतेपद प्राप्त केले.
  • भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा आशियाई चषक विजेतेपद जिंकले ज्याचे पहिल्यांदाच टी-२० प्रारुपमध्ये आयोजन केले होते. आधीचे पाचही विजेतेपद ५० षटकांच्या स्पर्धांमध्ये होते.
  • सामन्याच्या सुरुवातीलाच वादळी पाऊस झाल्यामुळे हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला.
  • टी २० मधील भारताचा हा सलग ७ वा विजय आहे. धोनीने आज ७ विजय मिळवत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. तसेच दोन्ही फॉरमॅटमध्ये आशिया चषक पटकावणारा धोनी हा पहिला कर्णधार बनला. यापूर्वी २०१० मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडिया चॅम्पियन झाली होती.
 पुरस्कार 
  • कुलेस्ट प्लेयर : विराट कोहली
  • सामनावीर : शिखर धवन
  • मालिकावीर : शब्बीर रेहमान

इराणचे अब्जाधीश जनजनी यांना मृत्युदंड

  • इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील बबक जनजनी यांना अब्जावधी डॉलर्सच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले असून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
  • जनजनी यांना डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
  • अमेरिका आणि युरोपियन संघटनेने जनजनी यांना काळ्या यादीत टाकले होते. कारण निर्बंधांच्या काळात त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून इराणला तेल विक्री केले होते. त्यामुळे इराणला फायदा झाला होता.
  • बबक मुर्तजा जनजनी इराणचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी आहेत. त्यांचा जन्म २१ मार्च १९७४ मध्ये तेहरानला झाला होता. त्यांच्याकडे नेदरलँड आणि इराणचे दुहेरी नागरिकत्व आहे.
  • सोरिनेट कंपनीचे ते भागीदार आहेत. सोरिनेट समूह हा इराणमधील बड्या कंपनीपैकी आहे. ही कंपनी सौंदर्य प्रसाधने, वित्त, बँकिंग, व्यावसायिक विमान सेवा, पायाभूत, इमारत बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.

सनदी अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार

  • स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदींची उत्कृष्ठ अंमलबजावनी करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमधील सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधान उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.
  • दरवर्षी २१ एप्रिल रोजी सार्वजनिक सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
  • या वर्षीपासून जनधन किंवा स्वच्छ भारत सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावनी करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा