चालू घडामोडी : २९ मे

इलेक्ट्रॉनिक धोरण तयार

  • किमान मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्याच्या उद्योगाला केंद्र सरकार करसवलत देणार आहे. भारतातील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला १० वर्षांसाठी करसवलत देण्यात येणार आहे.
  • इलेक्ट्रॉनिक उद्योगांची स्थिती सुधारावी, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा तसेच या क्षेत्रात मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन सुरू होऊन निर्यातीला चालना मिळावी अशा विविध उद्देशांनी नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक धोरण तयार केले आहे.
  • हे धोरण दोन स्तरांवर आखण्यात आले आहे. यामध्ये एका स्तरावर देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात कशी वाढेल तर, दुसऱ्या स्तरावर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आयात कमी कशी करता येईल यावर भर देण्यात येणार आहे.
  • या धोरणात भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना जागतिक स्पर्धेशी टक्कर देता येण्याजोगे बनवण्यात येणार आहे.
  • तसेच आयात कमी करण्यासठी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने देशातच तयार करण्यासाठी या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • इलेक्ट्रॉनिक उद्योगात एक अब्ज डॉलर गुंतवणूक करणाऱ्या व २० हजार लोकांना रोजगार देणाऱ्या कंपनीला १० वर्षांची करसवलत देण्याचा विचार या धोरणामध्ये मांडण्यात आला आहे.

सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारताची आशियाई सुवर्णपदक विजेती थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. 
  • कॅलिफोर्नियातील (अमेरिका) सॅलिनास येथे चालू असलेल्या पॅट यंग्स थ्रोवर्स क्लासिक २०१६ स्पर्धेत तिने हे निकष पूर्ण केले.
  • रिओ ऑलिम्पिकसाठी ६१ मीटर अंतर हे निकष आहेत. ३२ वर्षीय सीमाने ६२.६२ मीटर थाळी फेकण्याची किमया साधली.
  • सीमाने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम साधताना अमेरिकेच्या स्टेफनी ब्राऊन-ट्रॅफ्टनला मागे टाकले. स्टेफनीने २००८मध्ये देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • सीमा यंदा तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. याआधी २००४ आणि २०१२मध्ये ती ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती.
  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी क्रीडा प्रकारांसाठी पात्र ठरलेली ती १९वी खेळाडू आहे. ‘टॉप’ योजनेंतर्गत मिळालेल्या निधीमुळे आता सीमा अमेरिकेत विशेष सराव करणार आहे.
  • हरयाणावासी सीमाने २००४मध्ये आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम थाळीफेक ६४.८४ मीटर अशी नोंदवली होती. 
 सीमाचे यश 
  • २००६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक.
  • २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक.
  • २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक.
  • २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक.

अर्णब डे यांना ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’

  • सिंगापूर येथील अर्णब डे या भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञास वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सिंगापूरच्या प्रतिष्ठित ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.
  • त्यांनी महत्त्वाच्या ‘ए-२०’ नावाच्या ट्यूमर संप्रेसर (ट्यूमरला विकसित होण्यापासून रोखणे)वर अभ्यास करण्यासाठी ट्रान्सजेनिक उंदराची निर्मिती केली.
  • अर्णब यांनी यापूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पेप्टाइड आधारित प्रोड्रग्स’चा विकास केला होता. यासाठी त्यांना अमेरिकेच्या पेप्टाइड सिम्पोसियममध्ये ‘तरुण संशोधक’ म्हणून सन्मानित केले होते.
  • शास्त्रज्ञ अर्णब यांचा प्रबंध न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाने प्रस्तावित केला होता. 
  • पीएचडी कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी नामांकित विज्ञान मासिक आणि पुस्तकांचे जागतिक स्तरावर प्रकाशन करणारी ‘स्प्रिंगर’ ही संस्था थिसिस (प्रबंध) पुरस्कार प्रदान करते. पुरस्कार विजेत्यास ५०० यूरो डॉलर रोख रक्कम दिली जाते. 

स्पेनच्या टॅल्गो ट्रेनची वेगचाचणी

  • बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पेनच्या टॅल्गो कंपनीच्या अत्याधुनिक नऊ डब्यांची पहिली वेगचाचणी २९ मे रोजी उत्तर प्रदेशात घेण्यात आली.
  • टॅल्गो डब्यांना भारतीय इंजिन जोडलेल्या या ट्रेनने बरेली ते मोरादाबाद या मार्गावर ताशी ११५ किमी वेग गाठला. भारतातील सर्वांत जलद दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग सरासरी ताशी ८५ किमी आहे. 
  • या प्रवासासाठी वेळ तर कमी लागलाच शिवाय टॅल्गो डबे वजनाने हलके असल्याने ३० टक्के कमी ऊर्जा लागली.
  • टॅल्गोचे डबे अशा प्रकारे बनवण्यात आले आहेत की, वळणावर देखील गाडीचा वेग कमी करावा लागणार नाही.
  • यानंतर ‘राजधानी’च्या मार्गावर मथुरा ते पालवाल दरम्यान ४० दिवस वेगचाचणी घेतली जाणार आहे. त्यावेळी बुलेट ट्रेन ताशी १८० किमीपर्यंत वेगाने चालविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • सध्या राजधानीला दिल्ली ते मुंबई हे अंतर कापायला १७ तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनने हे अंतर १२ तासांमध्ये पार करता येईल.

अदिती कृष्णकुमार यांना ‘स्कॉलेस्टिक एशियन बुक पुरस्कार’

  • भारतीय लेखिका अदिती कृष्णकुमार यांना सिंगापूरचा ‘स्कॉलेस्टिक एशियन बुक पुरस्कार’ मिळाला आहे.
  • ३२००० शब्दांचे हस्तलिखित असलेल्या ‘लव ऑफ इंडियन हिस्ट्री’साठी हा पुस्कार देण्यात आला आहे. 
  • अदिती कृष्णकुमार यांना या आठवड्यात त्यांचे हस्तलिखित असलेल्या ‘कोडेक्‍स : द लॉस्ट ट्रेजर ऑफ द इंडस’साठी दहा हजार सिंगापूर डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे.
  • अदिती या गेल्या तीन वर्षांपासून सिंगापूरला राहत आहेत. त्यांचे हे हस्तलिखित लवकरच स्कॉलेस्टिक आशियाकडून प्रकाशित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा