चालू घडामोडी : २४ जानेवारी

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या उत्कृष्ट अमलबजावणीसाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार प्रदान केला.
  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन व राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातंर्गत देशभरातील जळगाव व उस्मानाबादसह १० जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले.
 जळगाव जिल्ह्यातील कार्य 
  • जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये सर्वसमावेशक जागृकता अभियान राबविण्यात आले.
  • केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमातंर्गत या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून ‘डिजीटल गुड्डा गुड्डी’ बोर्ड तयार करण्यात आला.
  • यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे.
  • या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते.
  • जिल्हा व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात आले आहेत.
  • याचा सकारात्मक परिणाम झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
  • २०११मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८४२ होता. या उपक्रमानंतर हा जन्मदर २०१५मध्ये ८६३ तर २०१६ मध्ये हा ९२२ पर्यंत पोहोचला आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्य 
  • उस्मानाबाद जिल्ह्याला कन्या भ्रुण हत्या कायद्याच्या कडक अमलबजावणीसाठी तसेच ‘आई व शिशु नियंत्रण प्रणाली’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
  • यातंर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, आरोग्य अधिकारी यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिबीर आयोजित करण्यात आले.
  • त्यात तीन महिने गरोदर असणाऱ्या महिलांचे अकेंक्षण करण्यात येते. पूढील सहा महिन्यांपर्यंत या महिलांना लागणाऱ्या औषधी, त्यांच्या चाचण्या शासनातर्फे करण्यात येतात.
  • यासह गरोदर महिलांच्या कुटूंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून जागृकता निर्माण केली जाते.
  • प्रसूतीनंतरचे पूढील तीन महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात लागणारे लसीकरण केले जाते.

युएईच्या राजपुत्रांचे भारतात आगमन

  • २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख अतिथी आणि संयुक्त अरब इमिरातचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल निहान हे २४ जानेवारी रोजी दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
  • २४ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान संयुक्त अरबच्या शिष्टमंडळासह ते भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद यांचा फेब्रुवारी २०१६नंतरचा हा दुसरा भारत दौरा आहे.
  • पंतप्रधान मोदींच्या २०१५नंतरच्या संयुक्त अरब इमिरात भेटीपासून दोन्ही देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.
  • संयुक्त अरब इमिरात हा देश भारताच्या विदेशी गुंतवणुकीतील महत्वाचा देश असून, भारताला उर्जा सुरक्षा पुरवणारा महत्वाचा देश मनाला जातो.
  • तसेच २०१५-१६ या कालखंडात भारताला इंधन पुरवठा करण्यात ५व्या क्रमांकावर हा देश होता.

शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ होणार

  • मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या निर्णयामुळे नोंव्हेंबर आणि डिसेंबर २०१६मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे पीककर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नाही.
 या बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय 
  • आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी आता डिग्री तर पदविका ऐवजी पदवी प्रधान करणार.
  • क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी.
  • अनिसाबाद येथे ११.३५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय.

महाराष्ट्राच्या तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

  • उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
  • येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. 
  • देशभरातील एकूण ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • या विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.
  • याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या स्पेशल फोर्सच्या १९ जवानांनाही शौर्यदपक जाहीर झाले आहे.
  • या जवानांच्या एका तुकडीचे नेतृत्व केलेल्या मेजर रोहित सुरी यांना किर्तीचक्र (शौर्यासाठी देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च मानाचा पुरस्कार) जाहीर झाला.
  • गोरखा रायफल्सच्या हवालदार प्रेम बहादूर रेसमी मगर यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तामिळनाडूमध्ये जलिकट्टू विधेयकाला मंजुरी

  • २३ जानेवारी रोजी तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
  • तामिळनाडूनमध्ये अनेक ठिकाणी जलिकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टू विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात आले.
  • तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्या २१ जानेवारीलाच जलिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती.

शेष भारत इराणी करंडक विजेता

  • प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या गुजरातचे ३७९ धावांचे आव्हान चार मोहऱ्यांच्या मोबदल्यात पार करत शेष भारताने इराणी करंडक जिंकला.
  • आव्हानाचा पाठवलाग करणाऱ्या शेष भारताचे चार मोहरे ६३ धावांत माघारी परतले होते.
  • मात्र चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा यांनी पाचव्या विकेटसाठी ३१६ धावांची भागीदारी रचून शेष भारताचा विजय निश्चित केला.
  • साहाने २७२ चेंडूंत २६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद २०३, तर पुजाराने २३८ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद ११६ धावांची खेळी केली. साहाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
 इराणी करंडक स्पर्धा 
  • १९५९-६०साली रणजी स्पर्धेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दिवंगत खजिनदार श्री इराणी यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा सुरु करण्यात आली. 
  • ही प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतातील संघातील निवडलेल्या खेळाडूंच्या संघात खेळली जाते.

सीआयएच्या संचालकपदी माईक पॉंपेओ

  • अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदी माईक पॉंपेओ यांची निवड झाली आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.
  • पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना पॉंपेओ यांची निवड महत्त्वाची मानली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा