प्रश्नसंच २१ - [पंचायत राज]

---------------------------------------------------
[प्र.१] महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ कोणत्या समितीच्या शिफारसीवरून पारित करण्यात आला?
१] बलवंतराय मेहता समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] ला.ना.बोंगिरवार समिती

उत्तर
२] वसंतराव नाईक समिती
------------------
[प्र.२] समुदाय विकास कार्यक्रम केव्हापासून सुरु करण्यात आला?
१] १५ ऑगस्ट १९५०
२] २६ जानेवारी १९५१
३] २ ऑक्टोबर १९५२
४] २ ऑक्टोबर १९५१

उत्तर
३] २ ऑक्टोबर १९५२
------------------
 [प्र.३] जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बलवंतराय मेहता समिती
२] अशोक मेहता समिती
३] जी.व्ही.के.राव समिती
३] बोंगिरवार समिती

उत्तर
१] बलवंतराय मेहता समिती
------------------
 [प्र.४] वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी किती समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली?
१] १२
२] १०
३] ८
४] ६

उत्तर
३] ८
 ------------------
 [प्र.५] वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या किती असावी अशी शिफारस केली?
१] ४०-७५
२] ५०-७५
३] ४०-६०
४] ३०-४०

उत्तर
३] ४०-६०
------------------
 [प्र.६] बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाची किती मंडळे सुचविली?
१] १५
२] २०
३] २५
४] २१

उत्तर
२] २०
------------------
 [प्र.७] बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाच्या मंडळाची लोकसंख्या किती असावी असे सांगितले?
१] २००००
२] ४००००
३] ४०००
४] ६००

उत्तर
३] ४०००
------------------
 [प्र.८] वसंतराव नाईक समितीने ग्रामसुचीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण किती कार्ये सोपविली आहेत?
१] ७८
२] १२४
३] ११२
४] ९३

उत्तर
२] १२४
------------------
[प्र.९] किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत असावी असे सुचविले?
१] ५००
२] ६००
३] १०००
४] ८००

उत्तर
३] १०००
------------------
 [प्र.१०] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली.
ब] अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
-------------------------------------------------------------