प्रश्नसंच ४८ - [इतिहास]

[प्र.१] तिस-या अंग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतान विरुद्ध पुढीलपैकी कोणी संयुक्त फळी उभी केली?
१] निजाम, कर्नाटकचा नवाब, इंग्रज
२] मराठे, इंग्रज, कर्नाटकचा नवाब
३] निजाम, मराठे, इंग्रज
४] त्रावणकोरचे राजे, मराठे, इंग्रज

उत्तर
३] निजाम, मराठे, इंग्रज
------------------
[प्र.२] गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा.
अ] १८९७ साली गोखलेंनी मॅंचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली.
ब] त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] अ व ब दोन्ही
------------------
[प्र.३] अयोग्य विधान ओळखा.
१] १८१३च्या चार्टर कायद्याने कंपनीचे भारतीय व्यापारावरील अधिकार समाप्त झाले.
२] १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
३] खेडा चळवळ मुंबई सरकार विरुद्ध होती.
४] १९२१मध्ये मोपला बंद आणि खिलाफत चळवळ एकमेकांत मिसळून गेले.

उत्तर
२] १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
------------------
[प्र.४] खालीलपैकी मोपला बंडाचे  तात्कालिक कारण कोणते?
१] राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फुट.
२] इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
३] इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.
४] जमीनदारांचे मोपल्यांवरील अत्याचार  

उत्तर
२] इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
------------------
[प्र.५] कॅबिनेट मिशन भारतात आले कारण...............
१] भारताचे सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता.
२] भारताच्या फाळणीला गती देण्याकरिता
३] भारताला सत्ता हस्तांतरित करण्याकरीता
४] राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता

उत्तर
४] राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीशी संबंधित नाही.
१] परकीय वस्तूंवर बहिष्कार
२] कायदा न्यायालयांवर बहिष्कार
३] इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
४] भारत सरकारच्या १९१९च्या कायद्यान्तर्गत घेतलेल्या निवडणुकांवर बहिष्कार.
 
उत्तर
३] इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] डेक्कन सभेची स्थापना गोखलेंनी केली.
ब] १८९५मध्ये टिळक व त्यांच्या सहका-यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेतून गोखले व रानडे यांना बाजूला सारले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] अ व ब दोन्ही
------------------
[प्र.८] होमरूलसंबंधी अयोग्य विधाने ओळखा.
अ] भारतीयांसाठी स्वराज्य हि होमरूलची मागणी होती.
ब] मद्रासमध्ये होमरूलची स्थापना अनी बेजंट यांनी केली.
क] या चळवळीमध्ये स्त्रिया व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ड] फ्रांसच्या होमरूलच्या धर्तीवर भारतात हि चळवळ सुरु झाली.

१] फक्त क व ड
२] फक्त क
३] फक्त ड
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त ड
------------------
[प्र.९] १८७८च्या भारतीय वृत्तपत्र कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ] भारतीय वृत्तपत्रांमधून प्रतिज्ञा घेण्यात आली कि त्यांनी सरकारविरोधी लिखाण करू नये.
ब] जिल्हा दंडाधिकारी अशा वृत्तपत्रांकडून अनामत रक्कम मागवू शकत होता.
क] दंडाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल त्यावर अपील करता येणार नाही.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] शिक्षणाशी संबंधित हार्टोग समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१] १९१३
२] १९१७
३] १९२९
४] १९३५

उत्तर
३] १९२९
-------------------------------------------------------------