प्रश्नसंच २५ - [इतिहास]

---------------------------------------------------
[प्र.१] निजाम-उल-मुल्क याने खालीलपैकी कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले?
१] हसनपूर
२] हैद्राबाद
३] कंधार
४] बरहानपूर

उत्तर
२] हैद्राबाद
------------------
[प्र.२] अलिप्तवाद नीतीचा जन्म कोठे झाला?
१] शांघाय
२] बेलग्रेड
३] दिल्ली
४] कोहिमा

उत्तर
२] बेलग्रेड
------------------
 [प्र.३] डलहौसीने नागपूर संस्थान कधी खालसा केले?
१] १८४८
२] १८५३
३] १८५४
४] १८५६

उत्तर
३] १८५४
------------------
 [प्र.४] भारतीय बोल्शेविक पक्षाची स्थापना कोणी केली?
१] सौम्येन्द्रनाथ टागोर
२] सत्यभक्त
३] एन.दत्त.मुजुमदार
४] जतिन दास

उत्तर
३] एन.दत्त.मुजुमदार
------------------
[प्र.५] भारत-चीन वाद यावर १९५४ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते?
१] भारत
२] चीन
३] ब्रिटन
४] अमेरिका

उत्तर
१] भारत
------------------
[प्र.६] १९३१ साली कोणत्या प्रांतीय सरकारने बालविवाह निवारण अधिनियम पारित करून बाल विवाह प्रथा बंद केली?
१] कोल्हापूर
२] नागपूर
३] बडोदा
४] बंगाल

उत्तर
३] बडोदा
------------------
 [प्र.७] घटना कालानुक्रमे लावा.
अ] सार्जंट योजना
ब] विश्वविद्यालय कायदा
क] वूड्सचा खलिता
ड] हंटर कमिशन

१] ड-ब-अ-क
२] क-ड-अ-ब
३] ड-क-अ-ब
४] ड-क-ब-अ

उत्तर
३] ड-क-अ-ब
------------------
 [प्र.८] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] देव समाजाची स्थापना १८८७ मध्ये लाहोर येथे झाली.
ब] देव समाजाचे संस्थापक शिवनारायण अग्निहोत्री होते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
३] दोन्ही योग्य
------------------
[प्र.९] बंगालमधून इंग्रज कशाची निर्यात करीत असत?
अ] मीरे
ब] रेशीम आणि कापसाचे उत्पादन
क] निळ

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] अ आणि ब
------------------
 [प्र.१०] विधान अ] १९४२मध्ये हैद्राबादमधील तेलंगणा येथे शेतकयांमध्ये असंतोष पसरला.
स्पष्टीकरण ब] १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाचा तो परिणाम होता.

पर्याय:
१] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर

उत्तर
२] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
-------------------------------------------------------------