प्रश्नसंच ३७ - [इतिहास]

[प्र.१] चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले?
१] मार्को पोलो
२] इब्न बतुता
३] अल बरुनी
४] इत्सिंग

उत्तर
१] मार्को पोलो
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते?
१] राष्ट्रकुट
२] प्रतिहार
३] पाल
४] चालुक्य

उत्तर
२] प्रतिहार
----------------
 [प्र.३] राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत?
१] मंडल
२] विषय
३] राष्ट्र
४] यापैकी नाही

उत्तर
३] राष्ट्र
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकुट राजाने जलसमाधी घेतली?
१] कृष्णा दुसरा
२] इंद्र तिसरा
३] कृष्ण तिसरा
४] अमोघवर्ष

उत्तर
४] अमोघवर्ष
----------------
[प्र.५] नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले?
१] भोज
२] धर्मपाल
३] देवपाल
४] नागभट्ट

उत्तर
२] धर्मपाल
----------------
[प्र.६] महंमद गझनीने सोमनाथवर स्वारी कधी केली?
१] १०१५
२] १०१८
३] १०२०
४] १०२५

उत्तर
४] १०२५
----------------
[प्र.७] महंमद गझनीच्या दरबारी कवी कोण होता?
१] अल बरुनी
२] फिरदौसी
३] अल मसुदी
४] सुलेमान

उत्तर
२] फिरदौसी
----------------
[प्र.८] चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.
१] विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली.
२] राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
३] राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली.
४] चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले.

उत्तर
२] राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
----------------
[प्र.९] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] अलवार संत हे विष्णूचे भक्त होते.
ब] नयनार संत हे विष्णूचे भक्त होते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
----------------
[प्र.१०] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] 'मान्यखेड' हि राष्ट्रकुट साम्राज्याची राजधानी होती.
ब] अमोघवर्षने मान्यखेड हि राजधानी वसवली.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
-------------------------------------------------------------