प्रश्नसंच ३१ - [इतिहास]

[प्र.१] गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलांचा अर्थ पुढे दिला आहे. त्यापैकी चुकीचा अर्थ निवडा.
१] अस्तेय : सुखाच्या हव्यासावर विजय मिळवावा
२] अहिंसा : हिंसा करू नये
३] सत्य : नेहमी खरे बोलावे
४] संयम : मोह टाळावा


उत्तर
१] अस्तेय : सुखाच्या हव्यासावर विजय मिळवावा
[अस्तेय : चोरी करू नये]
------------------
[प्र.२] संगम साहित्याचे केंद्र व राजाश्रय हा खालीलपैकी कोणता होता?
१] मदुराइचे पाण्डय
२] उरायपुरचे चोल
३] वंजीचे चेर
४] वरील सर्व


उत्तर
१] मदुराइचे पाण्डय
------------------
[प्र.३] गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे?
१] ऋग्वेद
२] अथर्ववेद
३] सामवेद
४] यजुर्वेद


उत्तर
१] ऋग्वेद
------------------
[प्र.४] आर्य हि संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते?
१] समान भाषेचा गट
२] आदिवासी लोक
३] वांशिक लोक
४] उच्चवर्णीयांचा गट


उत्तर
१] समान भाषेचा गट
------------------
[प्र.५] ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?
१] विल्यम जोन्स
२] जेम्स प्रिन्सेप
३] जॉन मार्शल
४] इजे मॅके


उत्तर
२] जेम्स प्रिन्सेप
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंगा युद्धाचा उल्लेख आढळतो?
१] स्तंभ लेख - १
२] स्तंभ लेख - ७
३] शिला लेख - ११
४] शिला लेख - १३


उत्तर
४] शिला लेख - १३
------------------
 [प्र.७] विधान अ] उत्तर वैदिक काळात राजपद हे वंशिक बनले.
स्पष्टीकरण ब] 'शतपत ब्राम्हण' साहित्यात दिलेल्या सूत्राचा वापर करून १० पिढ्यांकरिता राज्य राखून घेण्यात आले.

पर्याय:
१] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर


उत्तर
२] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
------------------
 [प्र.८] खालील राज्यकर्त्यांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा.
अ] समुद्रगुप्त
ब] कुमारगुप्त
क] चंद्रगुप्त
ड] स्कंदगुप्त

१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड
३] ब-ड-अ-क
४] ड-अ-क-ब


उत्तर
२] अ-क-ब-ड
------------------
[प्र.९] विधान अ] ऋग्वेदकालीन राजे प्रशासकीय व्यवस्था संभाळत नसत.
स्पष्टीकरण ब] ऋग्वेदिक अर्थव्यवस्था प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्यास सक्षम नव्हती.

पर्याय:
१] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर


उत्तर
१] अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
------------------
 [प्र.१०] ऋग्वेदिक काळामध्ये प्रार्थनेचा प्रमुख हेतू कोणता होता?
अ] अध्यात्मिक उन्नती साधने.
ब] भौतिक सुखाच्या गोष्टी मिळविणे.
क] मुक्ती मिळविणे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व


उत्तर
१] अ आणि ब
-------------------------------------------------------------