चालू घडामोडी : २९ जुलै

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य

  • जळगावची केळी, मराठवाड्यातील केसर आंबा, भिवापूर (नंदुरबार) मिरची, डहाणू घोलवडचा (पालघर) चिकू आणि आंबेमोहर (पुणे) तांदळास भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत.
  • यापूर्वी महाराष्ट्रातील १८ शेतमालास जीआय मिळाले असून, एकूण २३ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य ठरले आहे. 
जीआय मिळालेली महाराष्ट्रातील कृषी उत्पादने
जळगावची केळी मराठवाड्यातील केसर आंबा भिवापूर (नंदुरबार) मिरची
डहाणू घोलवडचा चिकू आंबेमोहर (पुणे) तांदूळ सोलापुरी डाळिंब
नाशिकची द्राक्ष वायगावची हळद मंगळवेढ्याची ज्वारी
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा कोकम कोरेगावचा वाघ्या घेवडा नवापूरची तूरडाळ
वेंगुर्ल्याचा काजू लासलगावचा कांदा सांगलीचे बेदाणे
बीडची सीताफळे जालन्याची मोसंबी जळगावची भरताची वांगी
पुरंदरचे अंजीर कोल्हापूरचा गूळ महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
नागपूरची संत्री आजऱ्याचा घनसाळ तांदूळ

 भौगोलिक उपदर्शन म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी व पेटंटची मान्यता दिली जाते, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१ साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यू.टी.ओ.) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • मानांकनाचे फायदे 
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी 
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख 
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव

गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

  • ‘सार्क‘ समूहाच्या अंतर्गत सुरक्षा किंवा गृहमंत्र्यांच्या इस्लामाबाद येथे ३ व ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
  • ही बहुस्तरीय आणि बहुपक्षीय परिषद असल्याने त्या दौऱ्यात भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित नाही. 

प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे निधन

  • बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे २७ जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वाराणसी येथे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
  • लच्छू महाराज यांचे खरे नाव लक्ष्मीनारायण सिंग असे होते.
  • ख्यातनाम तबलावादक असलेले वडील वासुदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी तबला शिकणे सुरू केले आणि त्यात प्रावीण्य मिळवले.
  • बनारसी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या लच्छू महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते, मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नसल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा