प्रश्नसंच ६७ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] 'सागर माला' कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे?
१] हवाई वाहतूक
२] सागर वाहतूक
३] ईशान्य भारत रस्ते विकास
४] भारत पाकिस्तान रेल्वे लाइन

उत्तर
२] सागर वाहतूक
------------------
[प्र.२] २००६ साली सुरु झालेल्या २० कलमी कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
१] ई-शासन
२] सामाजिक सुरक्षा
३] स्वछ पेयजल
४] अंतराळ संशोधन

उत्तर
४] अंतराळ संशोधन
------------------
[प्र.३] डॉ. आंबेडकर दुग्ध रोजगार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] महाराष्ट्र
२] उत्तर प्रदेश
३] गुजरात
४] बिहार

उत्तर
२] उत्तर प्रदेश
------------------
[प्र.४]  कल्पवृक्ष योजनेचा मुख्य हेतू कोणता?
१] अनाथ विधवांना पेंशन
२] गरीब स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
३] SC/ST आदिवासी स्त्रियांना  रोजगार उपलब्ध करून देणे
४] गरीब स्त्रियांना वैद्यकीय सेवा देणे

उत्तर
३] SC/ST आदिवासी स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
------------------
[प्र.५] पंचधारा हि मध्यप्रदेशची योजना कोणासाठी आहे?
१] शहरी रोजगार
२] ग्रामीण व आदिवासी स्त्रिया
३] ग्रामीण विधवा
४] ग्रामीण लघुउद्योग

उत्तर
२] ग्रामीण व आदिवासी स्त्रिया
------------------
[प्र.६] 'जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा' हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे?
१] मातोश्री योजना
२] जननी सुरक्षा योजना
३] वात्सल्य योजना
४] आयुष्यमती  योजना

उत्तर
३] वात्सल्य योजना
------------------
[प्र.७] 'राष्ट्रीय महिला कोष'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] या संस्थेची स्थापना १९९३ साली झाली.
ब] या योजनेंतर्गत गरीब महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
३] या कोषामध्ये स्त्रियांसंबंधी सर्व सामाजिक कार्याचा समावेश होतो.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.८] खालील दिलेल्या वैशिष्ठ्यांवरून योजनेचे नाव ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २५ डिसेंबर २००५ पासून झाली.
ब] हि योजना १००% केंद्र पुरस्कृत आहे.
क] केंद्रीय रस्ते निधी मध्ये जमा झालेल्या डीझेल उपकराचा वापर या योजनेसाठी होतो.

१] इंदिरा आवास योजना
२] नागपूर योजना
३] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
४] जवाहर रोजगार योजना

उत्तर
३] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
------------------
[प्र.९] 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रतिव्यक्ती १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
ब] अर्ज केल्यापासून १५ दिवसात रोजगार उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यास महागाई भत्ता दिला जातो.
३] प्रकल्पाची निवड, अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामसभेच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीची आहे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
२] ब आणि क
------------------
[प्र.१०] ‘वाल्मिकी आंबेडकर योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] हि योजना शहरी झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
ब] हि योजना ग्रामीण झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
३] हि योजना ग्रामीण मागासवर्गीय समाजातील अपंग लोकांसाठी आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] फक्त अ
---------------------------------------------